तुमच्याही घरामध्ये पुजेच्या दिव्यात फुल किंव्हा चंद्रकोर तयार होत असेल तर नक्की वाचा? काय असतात दैवी संकेत वाचून अंगावर काटा येईल …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, प्रत्येक जण आपल्या घरामध्ये देवपूजा करीत असतात. देवी-देवतांचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर राहावा यासाठी प्रत्येक जण काळजी घेत असतो. अगदी मनोभावे व श्रद्धेने आपली घरातील जी काही देवपूजा आहे ती करीत असतात. मित्रांनो दररोज आपण देवघरांमध्ये दिवा प्रज्वलित करतो. परंतु काही वेळेस त्या दिव्याच्या काजळीला फुलासारखा आकार आलेला आपण पाहतो. परंतु आपण याकडे दुर्लक्ष करतो.

 

परंतु मित्रांनो, काजळीला फुलाचा आकार आला तर नेमका याचा आपल्या जीवनामध्ये कोणता संकेत आहे हे मात्र कोणालाच माहिती नसते. तर मित्रांनो या पूजेच्या दिव्यातील काजळीला फुलाचा आकार आला तर काय घडते आणि त्या मागचा संकेत नेमका कोणता आहे . चला तर मित्रांनो आता मग जाणून घेऊया.

 

तर मित्रांनो आपण जेव्हा देवघरांमध्ये दिवा प्रज्वलित करतो. तेव्हा तो दिवा जळत असतानाच काही वेळेस त्या काजळीला फुलासारखा आकार तयार होतो किंवा जेव्हा दिवा शांत होईल त्यावेळेस त्या काजळीला फुलासारखा आकार तयार झालेले तुम्ही कित्येक वेळा पाहिले असेलच.

 

तर मग मित्रांनो पूजेच्या दिव्यामध्ये फुल झालेले हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे म्हणजेच आपण जी काही पूजा, व्रत केलेले आहे ते भगवंतापर्यंत पोहोचलेले आहे हा त्यामागचा संकेत असतो. भगवंत हे आपल्यावर प्रसन्न आणि खुश झालेले आहेत हे त्यावेळेस तुम्ही नक्की समजून जा.

 

मित्रांनो आपल्या घरामध्ये जो आपण दिवा लावलेला असतो तो दिवा आपण सकाळी आणि संध्याकाळी लावत असतो तर तसं न करता आपल्याला दिवसभर दिवा हा लावायचा आहे दिवसभर आपल्या घरामध्ये वात तेवत ठेवायची आहे. बऱ्याच जणांच्या दिव्यामध्ये विशिष्ट आकार हे तयार होत असतात. काहीजण 24 तास त्यांचा दिवा लावलेला असतो. अगदी 365 दिवस त्यांच्या घरामध्ये वात ही प्रज्वलितच होत असते अखंड दिवा जो आहे ती पेटत असते.

 

आपल्या घरामध्ये जो दिवा आहे तो नेहमी जळता किंवा पेटता आपल्याला ठेवायचा आहे दिवा कधीही आपल्याला वीजू द्यायचा नाही ज्या घरामध्ये दिवा पेटता असतो किंवा अखंड ज्योत असते त्या घरामध्ये मांगल्याच्या गोष्टी ह्या घडतच असतात त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी दरवळत असते माता लक्ष्मी त्या घरामध्ये कायम वास करत असते . म्हणून दिवा हा नेहमी प्रज्वल इथेच ठेवायचा आहे .

 

पण बरेच लोक असे आहेत की ते फक्त दिवसातून दोन वेळाच लावतात ते म्हणजे सकाळी एक आणि संध्याकाळच्या वेळेला पण तुमच्या दिवा मध्ये अखंड ज्योत असेल किंवा सकाळ संध्याकाळ जर तुम्ही दिवा लावताय त्याच्यामध्ये विशिष्ट आकार तयार होत असतील समजा की चंद्रकोर बनवत असेल बऱ्याच लोकांच्या दिव्यामध्ये चंद्रकोर बनत असतं तसेच बरेच लोकांच्या दिव्यामध्ये फुल बनत असते कमळाचे असेल गुलाबाचे असेल जास्वंदाचा असेल अशा अनेक आकार बनत असतात.

 

त्याचबरोबर ओम बनत असतं त्रिशूल बनत असतं काही लोकांच्या दिव्यामध्ये साक्षात आपले स्वामी देखील आलेले आहेत स्वामी महाराजांची मूर्ती देखील दिसत आहे महाराज जे काही ते दिव्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला दर्शन देत असतात दिवा लावताना दिवा ला पटकन काजळी येत असते किंवा काही वेळाने दिवा लावून झाल्यानंतर काजळी येत असते काजळी येण ही एक नॅचरल गोष्ट आहे कोणतीही वात असू दे त्याला लावल्यानंतर काजळी येतच असते.

 

मात्र त्या काजळी मध्ये जर विशिष्ट आकार दिसत असतील विशिष्ट अशा गोष्टी दिसत असतील तर ती गोष्ट खूप मोठी आहे तर ही गोष्ट देवी शक्तीची असणार आहे तुम्ही जी सेवा करत आहात तुम्ही जे भक्ती करत आहात तुम्ही जर वैशिष्ट्य व्रत करत आहात जर समजा तुम्ही गुरुवारची व्रत करत असाल इतर दिवशी एवढं काही नाही बोलत पण गुरुवारच्या दिवशी पूजा करायला सुरुवात केल्यावरच पाच मिनिटांमध्ये दिव्यामध्ये काजळी तयार होते याचा अर्थ असा होतो की तुम्ही जी सेवा करत आहात तुम्ही जी भक्ती करत आहात.

 

ती मनोभावे करत आहात तुमचे सेवा भक्ती स्वामी पर्यंत पोहोचलेले आहे तुमची सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामीन जवळ पोहोचलेली आहे आता समजा इतर दिवशी जर चंद्रकोर बनत असेल समजा जर आठ दिवस झाले असतील आठ दिवस सतत तुम्हाला दिव्यामध्ये चंद्रकोर दिसत असेल तर हा संकेत खूप जास्त शुभ आहे तुमची जी काही इच्छा आहे ती महाराजांच्या चरणी पोहोचलेली आहे आणि जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या देवी देवतांना मानता तर त्यांच्याजवळ ती पोहोचलेली आहे आणि जी काही तुमची इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होणार आहे बरेच जण सेवा हे करतच असतात.

 

दोन महिने तीन महिने झाले पण त्यांना स्वामींचे फळ मिळत नाही म्हणजेच की त्यांना पाहिजे ते मिळत नसल्यामुळे ते नाराज देखील होत असतात जर त्याच बरोबर आमच्या दिव्यामध्ये आकार तर बनतच असतात त्याचबरोबर इच्छा काही आमच्या पूर्ण होत नाहीत अकरा गुरुवार सुरू केले अकरा गुरुवार पूर्ण झाले दिव्यामध्ये रोज वेगवेगळे प्रकारचे आकार देखील बनत असतात पण इच्छा अजूनही पूर्ण झालेली नाही .

 

बऱ्याच वेळा असे होते की आपण नव्याने सेवेमध्ये येत असतो तोडकीमोडकी का असेना पण सेवा करायला सुरुवात करत असतो जी ही तोडकी मोडकी सेवा आहे ती भगवंतापर्यंत पोहोचलीच जाते आणि त्याचे जे शुभचिन्ह आहे जे शुभ संकेत आहे भगवंत हे आपल्याला दिव्याच्या वातीतून किंवा त्याच्यातून असा एक वेगळा आकार निर्माण करून आपल्याजवळ पोहोचवत असतात तुम्ही जी सेवा करत आहात ती माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे असा आपल्याला संकेत देखील देत असतात.

 

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 

Leave a Reply

Your email address will not be published.