जेवणापूर्वी अर्धा चमचा घ्या आणि चमत्कार पहा मोजून फक्त २१ दिवसात १० किलो वजन हमखास कमी होऊन, पोटाची चरबी मेनासारखी वितळून जाणार …..!!

आरोग्य टिप्स

 

मित्रांनो, आजकाल सगळीकडेच वजन वाढण्याची समस्या ही सर्वांनाच भेडसावत आहे. तसेच अनेकांना पोट साफ न होणे, अपचन,पित्त याचा त्रास यामुळे देखील आपले जगणे हे खूपच त्रासदायक बनले आहे. वजन वाढल्यामुळे आपले पोट सुटते. त्यामुळे आपल्या शरीराचा आकार हा बेढब प्रकारचा होऊन जातो. त्यामुळे आपल्याला कोणत्याही कार्यक्रमात जाणे देखील आपणाला नकोसे वाटते. पोटावरती अतिरिक्त चरबी वाढल्यामुळे आपले पोट सुटते.

तर मित्रांनो आपण यावरती अनेक प्रकारचे औषधे घेतो काही उपाय देखील आपण घरामध्ये करतो. परंतु या उपायांचा आपल्याला काहीच फायदा होत नसल्याकारणाने आपण उपाय करणे बंद करतो. तर मित्रांनो आजकाल जंकफूडचे सेवन तसेच अवेळी खाणे, अवेळी झोपणे तसेच तेलकट, मसालेदार पदार्थांचा वापर आपल्या आहारामध्ये असल्याकारणाने आपले वजन वाढते.

म्हणजेच आपल्या शरीरावर एक प्रकारची चरबी भरपूर प्रमाणात निर्माण होते. तर मित्रांनो आज मी तुम्हाला वाढलेले वजन तसेच कोणाला पोट साफ न होणे यासारखी समस्या असेल तर यावरती मी एक घरगुती उपाय सांगणार आहे. जो केल्याने तुमचे वजनही कमी होणार आहे आणि तुमची जी काही पोट साफ न होण्याची समस्या आहे ती देखील कमी होणार आहे.

तर मित्रांनो या उपायासाठी जे घटक लागणार आहेत हे घटक आपल्या घरी सहजासहजी उपलब्ध होतील. तसेच कोणतीही शस्त्रक्रिया न करता तसेच कोणत्याही केमिकल युक्त पदार्थांचा वापर न करता आपणाला हा उपाय आपल्या शरीरास फायदेशीर ठरू शकतो. मित्रांनो वजन कमी करण्यासाठी व्यायाम देखील खूपच महत्त्वाचा आहे. मित्रांनो तुम्ही अर्धा किंवा एक तास चालू शकता आणि चालल्यानंतर तुम्हाला अर्धा तास व्यायाम देखील करायचा आहे. ज्यामुळे आपली अतिरिक्त जी चरबी आहे ती कमी होण्यास मदत होते. तसेच मित्रांनो आपणाला आपल्या आहारामध्ये कॅलरीजयुक्त पदार्थांचा समावेश देखील करायचा नाही. कमी कॅलरीज युक्त पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये घ्यायला हवेत.

तर मित्रांनो तुम्ही आहारामध्ये केळी आणि चिकूचा वापर टाळावा. तसेच आपल्या घरामध्ये तुम्ही गाजराचा वापर करू शकता. गाजरामुळे चरबी वितळण्यास मदत होते. तुम्ही जेवणाअगोदर एक ते दोन गाजर तुम्ही चाऊन खावेत. यामुळे तुमची तुम्हाला भूक लागणार नाही आणि तुमचे जेवणाचे प्रमाण देखील कमी होईल. तसेच मित्रांनो चहा बंद करायचा आहे. तसेच जंक फूड्सचा वापर देखील आपण करायचा नाही.

तर मित्रांनो मी जो आज तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय केल्याने तुमचे वजन कमी करण्यास मदत होईल. तर चला तर जाणून घेऊयात हा उपाय नेमका कोणता आहे. तर मित्रांनो आपल्याला या उपायासाठी लागणार आहे ते म्हणजे जवस. यामध्ये फायबर हे मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने हे आपल्या पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतात.

तर मित्रांनो एक आठवडाभर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी चार चमचे जवस घ्यायचे आहे. तुम्हाला हे चार चमचे जवस गरम करून घ्यायचे आहे. म्हणजेच चार मिनिटे तुम्ही हे जवस मंद गॅस वरती गरम करून घ्यायचे आहे. मित्रांनो या उपायासाठी दुसरा जो घटक आपल्याला लागणार आहेत तो आहे जिरे.

तर तुम्हाला मित्रांनो सुकलेले जिरं घ्यायच आहे. जर तुम्हाला जिरे हे ओलसर आहेत असे वाटले तर तुम्ही ते जिरे वाळवून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो जिर्‍याचा वजन कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर महत्त्व आहे. तर मित्रांनो तुम्हाला तीन चमचे जिरे घ्यायचे आहेत. मित्रांनो पुढचा घटक आपल्याला जो लागणार आहे तो आहे ओवा. मित्रांनो पोटासाठी खूपच उत्तम असा पदार्थ म्हणजेच ओवा आहे. काहीही खाल्लेले पचवण्याची ताकद ही ओव्यामध्ये असते आणि आपले पोट साफ करण्यासाठी ओवा खूपच फायदेशीर ठरतो.

तर मित्रांनो तुम्हाला एक चमचा ओवा घ्यायचे आहे. यामध्ये आपल्याला चौथा घटक जो लागणार आहे तो म्हणजे विलायची म्हणजेच वेलदोडे. हे प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असतात. मित्रांनो आपल्याला या उपायासाठी हिरवे वेलदोडे लागणार आहेत. तर मित्रांनो या उपायासाठी आपणाला पाच ते सहा वेलदोड्याची आवश्यकता आहे. त्यावरची साल काढून तुम्हाला आतील भाग घ्यायचा आहे आणि हे सर्व घटक एकत्रितपणे तुम्हाला बारीक करायचे आहे. मिक्सरच्या साह्याने याचे बारीक चूर्ण करून तुम्हाला घ्यायचे आहे.

तर मित्रांनो हे सर्व जे आपण साहित्य वापरलेलं आहे हे सर्व वाळलेलं असावे. जर ओलसर असेल तर तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये वाळवून ते घ्यायचे आहे. तर मित्रांनो हे चूर्ण तुम्हाला बारीक करून घेतल्यानंतर जेवणाच्या अगोदर एक ग्लास गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा ही केलेली पूड टाकायची आहे. तुम्ही या पाण्यामध्ये चवीसाठी सैंधव मीठ देखील वापरू शकता आणि तुम्हाला हे जेवणाच्या अगोदर घ्यायचे आहे.

तर मित्रांनो तुम्हाला हा उपाय सलग पंधरा दिवस ते एक महिना करायचा आहे. पंधरा दिवस केल्यानंतर तुम्हाला सात दिवसाचा गॅप ठेवायचा आहे आणि नंतर तुम्ही सात दिवसाचा गॅप झाल्यानंतर परत हा उपाय केला तरीही चालतो. तर हा उपाय मित्रांनो प्रत्येक जण करू शकतो.

परंतु मित्रांनो प्रेग्नेंट असणाऱ्या स्त्रियांनी हा उपाय अजिबात करू नये. तर मित्रांनो हा उपाय केल्याने तुमचे वजन हे झटपट कमी होऊ लागेल. तसेच तुमचे पोट साफ होण्याची जी काही समस्या आहे ती समस्या दूर होऊन जाईल. असा हा घरगुती, आयुर्वेदिक उपाय तुम्ही अवश्य करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.