ग’र्भा’वस्थेत नारळ खाल्ल्याने काय होते.? खूपच कमी लोकांना माहित असलेलं सत्य.!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपल्या पेज वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नारळ हे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. नारळामध्ये असे काही औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराला खूप सारे पोषकतत्व पुरवीत असतात. आपल्याला बाजारांमध्ये नारळापासून तयार झालेल्या अनेक वस्तू व गोष्टी पाहायला मिळत असतात आणि या सर्वांचा उपयोग करून आपण आपले जीवन समृद्ध बनत असतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला नारळा बद्दल अशी काही महत्त्वाची माहिती सांगणार आहोत, ज्या माहितीमुळे तुमचे जीवनच बदलून जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात त्याबद्दल..

नारळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्व अ उपलब्ध असतात आणि हे जीवनसत्व आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचे ठरते. अनेकदा लहान मुले बाहेरचे पदार्थ खूप मोठ्या प्रमाणावर खात असतात. चॉकलेट तेलकट-तुपकट पदार्थ खात असतात आणि अनेक गोड पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे मुलांच्या पोटामध्ये लहान कृमी ,जंत सुद्धा होत असतात. लहान मुलांना नियमितपणे ओले खोबरे खायला दिले तर त्यांच्या पोटातील कृमी जंत सुद्धा नष्ट होण्यास मदत होते.

जर तुमची नजर कमजोर झालेली असेल, डोळ्यांना स्पष्ट दिसत नसेल, डोळ्या पुढे नेहमी अंधारी येत असेल तर अशा वेळी आपण खोबरे व गूळ एकत्र करून नियमितपणे खाल्ले तर यामुळे आपली नजर तेज होण्यासाठी मदत होत असते. आपल्यापैकी अनेक व्यक्तींना मुळव्याध असतो आणि मुळव्याध दूर करण्यासाठी आपण वेगवेगळे उपचार सुद्धा करत असतो परंतु अनेकांना माहिती नसेल की मुळव्याधवर नारळ सुद्धा अत्यंत गुणकारी ठरत असतो.

मूळव्याधीच्या ज्या काही शेंडे असतात त्यांची राख करून त्या राखेची पावडर व १०० ग्रॅम पिठीसाखर एकत्र करून आठ दिवस नियमितपणे सेवन केले तर रक्ती मूळव्याध पूर्णपणे बरा होऊन जातो व शौचालय द्वारे रक्त पडणे सुद्धा कमी होते. आपल्या शरीरातील मुतखडा सुद्धा बाहेर काढण्यासाठी नारळाच्या पाणीचा उपयोग होत असतो.नारळाच्या पाण्यामध्ये आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याची क्षमता असते आणि जर आपण नियमितपणे नारळ पाणी पित राहिले तर आपल्या शरीरामध्ये जे विषारी घटक व मू’त्रा’शय मध्ये जे खडे निर्माण झालेले असतात ते खडे बाहेर पडण्यासाठी नारळाचे पाणी लाभदायक ठरते तसेच नियमितपणे आपल्या केसांना नारळाचे तेल लावले तर आपले केस मजबूत होतात.

केसांमध्ये कोंडा निर्माण झाला असेल, अकाली पांढरे केस झाले असतील, केस पातळ झाले असतील व अन्य केसांच्या समस्यांवर सुद्धा नारळाचे शुद्ध तेल उपयुक्त ठरते. आपल्यापैकी अनेकांना शीघ्रपतनाची समस्या होत असते अशा वेळी नारळ महत्त्वाची भूमिका बजावत असतो.नारळाचे पाणी नियमितपणे पिल्याने शीघ्रपतनाची समस्या दूर होतेच पण त्याचबरोबर वीर्य सुद्धा घट्ट होते. महिलांच्या मासिक पाळीच्या दरम्यान नारळ पाणी प्यायले तर पोट दुखी वेदना कमी होतात. जेव्हा एखादी महिला गरोदर असते अशा वेळी अनेकांकडून नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

नारळ पाणी प्यायल्याने महिलेला ऊर्जा तर मिळते पण त्याच बरोबर महिलेच्या पोटामधील बाळ सुद्धा तंदुरुस्त राहते. गर्भधारणा झाल्यानंतर नियमितपणे ओले खोबरे व नारळ पाणी प्यायलेले बाळ गोरे बनते व धष्टपुष्ट सुद्धा बनते.आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा विकार असतात अशावेळी हे त्वचा विकार दूर करण्यासाठी नारळाचे तेल व त्यामध्ये दोन ते तीन लिंबू रस आपण टाकले आणि या तेलाने आपण मालिश केली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार असेल तर दूर होण्यास मदत होत असतो.

केसांमध्ये कोंडा झाला असेल तर अशा वेळी नारळाचे तेल आणि त्यामध्ये दोन ते तीन कापूराच्या वड्या मिक्स करून हे मिश्रण आपण आठ दिवस केसांना लावले तर केसांमधील कोंडा निघून जाण्यास मदत होत असते त्याचबरोबर स्वयंपाक करताना आपल्या हाताला चटका लागला व कोणत्याही कारणाने हात भाजला असेल तर अशा वेळी नारळाचे तेल व चुना सम प्रमाणामध्ये मिक्स करून हे मिश्रण आपल्याला भाजलेल्या ठिकाणी लावायचे आहे, असे केल्याने त्वचेवरील म्हणजेच आग कमी होऊ लागते.

नारळाचे पाणी आपले नखाचे आरोग्य सुंदर राखण्यासाठी नैसर्गिक औषध मानले जाते. जर आपण नारळाच्या पाण्याने आपली नखं स्वच्छ केली तर त्यांना तजेलदार सुद्धा प्राप्त होत असतो त्याच बरोबर आपल्या चेहऱ्यावर काळे डाग,पिंपल्स निर्माण झाले असतील तर अशा वेळी नारळाच्या पाण्याने आपण आपला चेहरा स्वच्छ धुतला तर चेहऱ्यावरील काळे डाग, वांग निघून जाण्यास मदत होत असते तर हे सगळे नारळाचे विविध उपाय म्हणून तुम्ही सुद्धा तुमचे आरोग्य चांगले राखणे करिता नारळाच्या अनेक गोष्टींचा वापर दैनंदिन जीवनामध्ये अवश्य करा आणि आपले आरोग्य चांगले ठेवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Marathionline.com याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published.