तुमचा चेहरा पाहून तुमचे वय कोणी सांगू शकणार नाही ; वांग, काळे डाग, खड्डे, कायमचे मुळापासून निघून जातील जळलेलं जखमेचे डाग मुळापासून नष्ट होणार? डॉ ; स्वागत तोडकर टिप्स …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला कामासोबतच आपल्या शरीराचीही तितकीच काळजी असते. त्यातही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला चेहरा. आपला चेहरा हीच आपली ओळख असते. त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि सुंदर दिसावा यासाठी अनेकजण निरनिराळ्या प्रकारचे उपाय करत असतात. मात्र अनेकांच्या चेहऱ्याला वांग या त्वचेच्या समस्येचा सामान करावा लागतो. ज्यामुळे चेहऱ्यावर डाग दिसू लागतात. मित्रांनो ज्यावेळी आपण आपली ही समस्या घेऊन डॉक्टरांकडे जातो. तेव्हा डॉक्टर आपल्याला त्यावर महागडी औषधे लिहून देतात किंवा एखादी सर्जरी करायला सांगतात. परंतु मित्रांनो अनेकदा आपल्याला ही सर्जरी करून घेणे किंवा ही औषधे घेणे परवडत नाही.

जरी आपण ही औषधी घेतली किंवा डॉक्टरांची सर्जरी देखील आपल्या चेहऱ्यावर करून घेतली तरीही त्याचा काही परिणाम होत नाही किंवा अनेकदा त्याचा साईड इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर किंवा त्वचेवर होतो. म्हणूनच आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

म्हणूनच मित्रांनो जर आपण अशा आपल्या समस्या घेऊन डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा किंवा महागडी औषधी घेण्या अगोदर आपल्या आयुर्वेदाची मदत घेऊन त्यामध्ये सांगितलेले काही छोटे छोटे उपाय आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपल्या अनेक समस्या लवकरात लवकर दूर होऊ शकतात.

तर मित्रांनो आज आपण आपल्या चेहऱ्यावर असणारे काळे डाग, वांग आपण कशा पद्धतीने घरच्या घरी सोप्या पद्धतीने आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या माहिती नुसार घालवू शकतो. हे आज आपण जाणून घेणार आहोत.प्रत्येक व्यक्तीला आपला चेहरा स्वच्छ व सुंदर असावा वाटतो. सुरकुत्या व खड्डे नको वाटतात. या सर्व गोष्टींसाठी एक साधा सोपा व घरगुती करता येईल असा उपाय सांगणार आहे.

या उपायांसाठी घरातील तीन वस्तू लागणार आहेत. यातील पहिला घटक आहे तो म्हणजे केळी. मित्रांनो आपण बाजारातून केळी आणतो व साल फेकून देतो. पण हे केळीचे साल अत्यंत उपयुक्त असून याचा चेहरा संबंधित फायदा पाहणार आहोत.

तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला यासाठी पिकलेल्या केळीचे साल लागणार आहे. सुरुवातीला एका केळीच्या सालाचे बारीक तुकडे करून घ्या. या सालीमध्ये विटामिन ई, डी,सी मोठ्या प्रमाणात असते. जे चेहऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आपल्याला साल दोन चमचे होईल इतकी घ्यायचे आहे किंवा चेहऱ्याला पुरली पाहिजे.

बरेच लोक म्हणतात की, हे केळी केमिकल टाकून पिकवली जातात म्हणून थोडा वेळ मिठाच्या पाण्यात धुवून घेतली पाहिजे आणि या साली बारीक कट करून त्यानंतर पेस्ट करून वापरायच्या आहेत. मित्रांनो यानंतर आपल्याला मध वापरायचा आहे. मध हा अत्यंत उपयुक्त असून लोकांमध्ये असा गैरसमज आहे की यामुळे केस पांढरे होतात.

परंतु असा उल्लेख कोणत्याच पुस्तकात नाहीये. यासाठी आपल्याला एक चमचा मध लागणार आहे. हे सर्व मिश्रण एकत्रित करायचे आहे. हे सर्व चांगले मिक्स करून वाटून घ्यायचे आहे. म्हणजेच केळीची साल, मध हे मिक्स करून त्याची पेस्ट करून घ्यावी.

जळलेले किंवा एक्सीडेंट नंतर चे काळे डाग घालवण्यासाठी दुसरा एक सोपा उपाय असा आहे की सकाळी सकाळी उठल्यानंतर तोंड धुण्यापूर्वी जी लाळ असते ती लाळ लावायची आहे. ती साधारणत पाच ते सात महिने लावायची आहे. हे रोज लावायचे आहे. तुमचे डाग नक्की निघून जाते.

केळीची साल, मध यामध्ये तिसरा घटक लागणार आहे ती म्हणजे दुधावरची साय. ही साय एक चमचा घ्यावी. सायीमुळे त्वचा मुलायम राहते. कोमल बनते. त्याचप्रमाणे त्वचेमध्ये मॉइस्चराइजर टिकून राहते.

मित्रांनो जर सायी मिळाली नाही तर दुधाचा वापर करावा. एखाद्याला मध नको असेल तर फक्त केळीची साल व दुध घेतले तरी चालेल. हे मिश्रण दिवसभरात केव्हाही एक वेळ लावायचे आहे. अर्धा तास चेहऱ्यावर ठेवायचे आहे व नंतर कोमट पाण्याने धुवायचे आहे.

हा उपाय तुम्ही चेहऱ्यासाठी 15 ते 20 दिवस केल्यानंतर तुमचा चेहरा उजळेल. ब्लॅक हेड्‍स कमी होतील व वांग निघून जाईल. परंतु शरीरावरील डाग घालवायचा असेल तर हा उपाय तीन ते पाच महिने करायला हवा. रोज लावणे गरजेचे आहे. वांगासाठी देखील हा उपाय जास्त काळ करणे गरजेचे आहे.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.