मित्र मैत्रिणींनो घरामध्ये गरिबी,दरीद्रीता, आणतात या पाच गोष्टी तुम्हा सर्वांना माहित असणे गरजेचं आहे महत्वपूर्ण माहिती …..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो ज्या घरात सकाळ सायंकाळ तुपाचा दिवा लावला जातो. त्या घरावर सर्व देवी-देवतांची कृपा असते.त्या घरावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्या घरात गरिबी कधीच नांदत नाही आणि माता लक्ष्मीची मनोभावे दररोज पूजा करायला हवी. माता लक्ष्मी घराची देवी आहे म्हणून त्यांची पूजा केल्याने आपल्या घरात धन म्हणजेच लक्ष्मीचे आगमन होते मात्र अनेक जण माता लक्ष्मीची पूजा करून सुद्धा गरीबच राहतात.

त्यांच्या घरात पैसा,धन संपती येत नाही. आलेला पैसा जास्त वेळ न थांबता त्वरित निघून जातो. घरामध्ये गरीबी, दरीद्रीता येते. अशावेळी आपल्या हातून घडणाऱ्या चुका आपण कटाक्षाने टाळायला हव्या. पहिली चूक आहे अतिथी देव भव म्हणजे पाहुणे हे देवा समान असतात आणि जेव्हा कधी तुमच्या घरात पाहुणे येतील त्यांचे योग्य रीतीने पाहुणचार करावा. तसेच काहीवेळा अचानक घरी आलेले पाहुण्याना पाहून त्यांचा अपमान करतो.

आलेले पाहून काही जणांच्या कपाळावर आठ्या पडतात आणि जे लोक अतिथींचा अपमान करतात, त्या घरात माता लक्ष्मी राणी कधीच टिकत नाही.अतिथी देवो भव म्हणजे पाहुणे हे देवासमान आहेत. आपल्याकडे प्राचीन परंपरा आहे की, पाहुणे आल्यानंतर सर्वात प्रथम आपण त्यांना पाणी दिले पाहिजे. पिण्यास पाणी द्यावे. याचे कारण म्हणजे असे केल्याने अशुभ ग्रहांचा तात्काळ प्रभाव नष्ट होतो.

त्याचप्रमाणे दुसरी चूक आपल्या घरात मध नक्की असेल. तसेच मध हे अतिशय पवित्र मानले जाते. हिंदू धर्मामध्ये ज्या घरामध्ये मध असते त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा टिकत नाही. ज्या घरांमध्ये मध असते त्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. त्या घरामध्ये बरकत राहते.

मध ठेवण्याची जागा जर स्वच्छ असेल किंवा मध अशा ठिकाणी ठेवलेलं आहे ज्या ठिकाणी स्वच्छता नाही. त्या ठिकाणी अंधारलेली जागा आहे किंवा मध तुम्ही अशा ठिकाणी ठेवलेले आहे की ते भांडण किंवा बरणी कधी धुतलेलच नाही आहे. त्या बरणीवर मळ साचला आहे तर धूळ साचलेली आहे. तर अशा वेळी घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि यामुळे घरात अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अनेक जण माता महालक्ष्मीची मनोभावे पूजा करतात. मात्र या पूजेमध्ये खंड पडतो अशा वेळी आपल्याला विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कि, समुद्रमंथनाच्या वेळी जे 14 रत्न बाहेर आले होते त्यापैकी एक रत्न म्हणजे महालक्ष्मी माता आहे. महालक्ष्मी माता या पाण्याप्रमाणे चंचल असतात ते कधीच एका व्यक्तीकडे थांबत नाही.

म्हणून ज्या घरांमध्ये महालक्ष्मीची पूजा होत नाही तेथे महालक्ष्मी थांबत नाही आणि तेथे सदा लक्ष्मी वास करत असते. म्हणूनच घरामध्ये दारिद्रता, आजारपण, भांडण, कटकटी इत्यादी होत असतात. जर या सगळ्या समस्या तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये आणायचे नसतील तर तुमच्या देव्हाऱ्यामध्ये भगवान श्रीविष्णु आणि माता महालक्ष्मी यांची पूजा नित्यनेमाने करा. यामुळे तुमच्या आयुष्यात सुख शांती धनप्राप्ती होईल.

तुम्ही बाहेरून घरात येताना काही गोष्टींची नेहमी काळजी घेत चला. आपण घराच्या बाहेर अनेक ठिकाणी फिरत असतो. या सगळ्या ठिकाणी फिरत असताना आपल्यासोबत अनेक नकारात्मक शक्ती सुद्धा असतात. म्हणून अनेकदा घरी येताना आपल्या चपला-बूट घराच्या उंबरठ्याबाहेर काढणं आवश्यक आहे.

कारण घर हे आपल्यासाठी पवित्र स्थान असते. जेव्हा आपण घरातून बाहेर निघतो आणि बाहेरून घरात येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या सगळ्या शक्ती आपल्या सोबत येत असतात म्हणून उंबरठ्याबाहेर बूट चपला बाहेर काढणं गरजेचं ठरतं.

शेवटचे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या घरामध्ये सुगंधित वातावरण असते अशा ठिकाणी सकारात्मक ऊर्जा वास करत असते. तेथे नेहमी प्रसन्न आणि दिव्य शक्ती तुम्हाला चांगले आशीर्वाद प्राप्त करत असतात. म्हणूनच तुमच्या घरात नेहमी स्वच्छता असणे गरजेचे आहे. यातील सर्व खोल्या साफसफाई करणे आवश्यक आहे.

जर समजा तुमचा वाईट काळ चालत असेल तर तुमच्या घरामध्ये सुगंधित वातावरण तयार करा. जेणेकरून तुम्हाला मानसिक दृष्ट्या चांगले वाटेल आणि तुमच्यावर माता महालक्ष्मी यांची कृपा होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.