‘या’ सात आजारात किंवा लक्षणात वांगे खात असाल तर जरा डोळे उघडून नीट वाचा या लोकांनी एक अजिबात खाऊ नका नाहीतर ……!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण अशीच माहिती जाणून घेणार आहोत.या माहितीच्या आधारे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे. पण त्याचबरोबर या अशा पदार्थाबद्दल अशा काही नवीन गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. ज्यामुळे आपल्याला भविष्यात या पदार्थाचे सेवन करताना विशिष्ट काळजीसुद्धा घ्यायचे आहे. तसे तर हा पदार्थ आपल्याला मोठमोठ्या हॉटेल पासून ते ढाबापर्यंत सर्व ठिकाणी उपलब्ध होतो. बाजारामध्ये ही फळ भाजी अनेकदा उपलब्ध असते आणि आपल्या सर्वांच्या घरामध्ये आठवड्यातून दोन ते तीन वेळा ही भाजी सरासरी बनवली जाते.

या भाजीच्या अंगी असे काही गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त तर असतात. पण आपणच अति प्रमाणामध्ये याचे सेवन केले तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर सुद्धा होऊ शकतो. चला तर मग जाणून घ्या अशी नेमकी कोणती जी भाजी आहे ती आपल्या शरीरावर परिणाम चुकून सुद्धा खायची नाही.

मित्रांनो वांगी ही आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असले तरी काही आजारांसाठी वांगे खाणे अतिशय चुकीचे मानले जाते. यामुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. वांगी ही भाजी बाजारामध्ये सहज उपलब्ध होत असते आणि ही बाराही महिने उपलब्ध असणारी अशी एकमेव भाजी आहे.

या भाजीचा उपयोग आपण अनेकदा वेगवेगळ्या पदार्थांना चव आणण्यासाठी किंवा पदार्थांची रंगत वाढवण्यासाठी वापरत असतो. म्हणूनच अनेकदा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये काही आजार असतील तर वांग्याचे सेवन करणे वर्ज्य मानले जाते. परंतु काहीवेळा वांगे हे आपल्या शरीरासाठी महत्त्वाची भूमिका बजावते आणि जर तुम्हाला धोतराचे विशेष घडले असेल तर अशावेळी वांग्याचे रस पिण्यास दिले जाते.

ज्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारची औषधे चालू असतील मग ती ॲलोपॅथी होमिओपॅथी असेल तर अशा व्यक्तीने वांग्याचे सेवन करणे टाळायला हवे. वांगी हे वातुल आहे आणि आपण औषध सेवन करत असतो त्याचा आपल्या शरीरावर चांगला परिणाम होत असतो. जर आपण अशा वेळी वांग्याचे सेवन केले तर ते परिणाम योग्यरीत्या होत नाही.

ज्या व्यक्तींना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो, दमा आहे. अशा व्यक्तींनी वांग अजिबात खाऊ नये. ज्या व्यक्तींना त्वचा चे विकार आहेत. ज्या व्यक्तींना सर्दी, खोकला वारंवार होत असेल व कोणत्याही प्रकारची ही त्वचा विकार व एलर्जी होत असेल तर अशा व्यक्तींनी वांगे अजिबात खाऊ नये. ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये वारंवार पित्त तयार होते विशेष करून आम्लपित्ताचा ज्या व्यक्तींना त्रास आहे त्यांनी वांगे खाऊ नये. कारण की ज्यामुळे ॲसिडिटी सुद्धा होत असते.

त्याचबरोबर वांग्याच्या अंगी भरपूर प्रमाणामध्ये उष्णता असल्याने आपल्याला वारंवार वांगे खाल्ल्याने शरीरामध्ये उष्णता वाढते. उष्णताच्या संदर्भात असणारे वेगवेगळे आजार सुद्धा वाढतात. ज्या व्यक्तींना डायबिटीस वर शुगरचा त्रास होतो अशा व्यक्तींनी अजिबात वांगी खाऊ नये यामुळे डायबिटीस नियंत्रणामध्ये राहत नाही.

त्याचबरोबर ज्या व्यक्तींना किडनी संदर्भातील वेगवेगळे आजार आहेत व मुतखडा आहे अशा व्यक्तीने तर अजिबात वांग्याचे सेवन करू नये. कारण की वांग्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये बिया असल्याने त्याचा विपरीत परिणाम आपल्या किडनीवर होऊ शकतो आणि मुतखडा वाढण्याची शक्यता सुद्धा असते.

म्हणून अनेकदा वांगे, टमाटर आणि पालक मुतखड्याचा त्रास असणाऱ्या रुग्णाला खाण्यासाठी दिले जात नाही. कारण कि यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये क्षार पदार्थ असल्याने या सर्व गोष्टींमुळे मुतखडा वाढण्याची शक्यता असते. वांगे हे जरी चवीला चांगले असले तरी आपल्या शरीरासाठी वातुल आहे. म्हणून या वांग्याचे सेवन करताना आपल्याला विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

जर तुम्ही सुद्धा तुमच्या आहारामध्ये वांग्या चा समावेश जास्त करत असाल तर आजपासूनच वांग्याचे सेवन कमी करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा तुम्हाला भविष्यात त्रास होण्याची शक्यता आहे.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.