हजारो रुपयांमध्ये विकल्या जाणाऱ्या या सीताफळांच्या बियांचे होणारे फायदे वाचून तुम्हीपण थक्क व्हाल ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्या आजूबाजूला अनेक असे फळझाडे असतात. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. परंतु अनेकदा आपल्याला त्यांचे फारसे फायदे माहिती नसल्याने आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये सुद्धा आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. आज आपण सीताफळ खाण्याचे महत्त्वाचे फायदे जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर या फळाचे असे कोणते औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी उत्तम महत्त्वाची भूमिका बजावत असतात. सीताफळ हे आपल्याला आजूबाजूला सहज उपलब्ध होऊन जाते.

या सीताफळाचे आपल्या शरीराला औषधी गुणधर्म भरपूर आहे. सिताफळ यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, विटामिन के, तंतुमय पदार्थ ,सिग्न पदार्थ, पिष्टमय पदार्थ ही सर्व घटक उपलब्ध असतात.आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा या फळाला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे. हे फळ कफनाशक, पित्तनाशक मानले गेले आहे.

तसेच हे फळ बलवर्धक, पित्तशामक मानले गेलेले आहे. सीताफळ मध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते म्हणून जेव्हा मुलामुलींची वाढ होत असते अशा वेळी जर आपण कॅल्शिअम दिले तर त्यांची शरीर मजबूत बनते व शरीर मजबूत तर बनतेच पण त्याचबरोबर हाडांची स्थिती सुद्धा व्यवस्थित राहते. मित्रांनो तसेच सीताफळाच्या बियांमध्ये सुद्धा औषधी गुण असून यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

यातील नैसर्गिक अ‍ॅन्टी ऑक्सिडेंटमुळे कॅन्सर आणि डायबेटिस सारखे आजार दूर राहतात. सीताफळ आणि त्याच्या बियांच्या फायद्यांविषयी जाणून घेवूयात तर मित्रांनो या फळांच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन सी असते आणि यामुळेच मित्रांनो यातील विटॅमिन-सी मुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. शरीराला भरपूर प्रमाणात उर्जा मिळते.

त्याचबरोबर शरीराला विटॅमिन-बी देखील मिळते आणि रक्ताची कमी म्हणजेच एनीमियापासून मुक्ती मिळते. मित्रांनो यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण हे मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे यातील मॅग्निशियम शरीरातील पाणी संतुलित ठेवते. मित्रांनो ज्या व्यक्तींना हाय ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाबाचा त्रास आहे यांच्यासाठीही या बिया खूपच फायदेशीर आहेत. कारण यामुळे आपला रक्तदाब नियंत्रित राहतो.

त्यानंतरच मित्रांनो सर्वात महत्त्वाचा जो फायदा आपल्याला होतो तो म्हणजे शुगर संबंधित. मित्रांनो या बियांमुळे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि यातील विटॅमिन-सी आणि विटॅमिन-ए मुळे दृष्टी चांगली होते. यातील तांबे आणि फायबरमुळे पचनशक्ती वाढते. त्याचबरोबर मित्रांनो पोटासंबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी या बियांमुळे गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळतो.

यातील मॅग्नेशियम आणि पोटॅशियममुळे कोलेस्टेरॉल कमी होते. हृदय निरोगी राहते आणि याच्या सेवनाने ऊर्जा मिळाल्याने थकवा दूर होतो. त्याचबरोबर गर्भावस्थेतील मूड स्विंग, मॉर्निंग सिकनेस, आळस अशा समस्या दूर होतात.

मित्रांनो याचा सर्वात मोठा जो फायदा आपल्याला होतो तो केस संबंधित समस्या दूर करण्यासाठी. मित्रांनो ज्या पुरुषांना टक्कल पडले आहे किंवा जागी जागी केस गेलेले आहेत अशा पुरुषांनी जर या बियांचा आतील बाजूस जो गर असतो तो गर जर व्यवस्थितपणे एकत्र करून त्याची पेस्ट केली आणि ती टक्कल असलेल्या ठिकाणी लावली तर यामुळे आपले टक्कल जाते. तिथे केस येऊ लागतात.

त्याचबरोबर मित्रांनो ज्या व्यक्तींच्या किंवा महिलांच्या केसांमध्ये वा किंवा इतर कीटक झाले असतील तर अशा महिलांनी या विहार रात्रभर पाण्यात भिजवत ठेवावे. सकाळी यांचे व्यवस्थितपणे खलबत्त्याच्या साहाय्याने मिश्रण म्हणजेच पेस्ट तयार करून घ्यावी. ही पेस्ट रात्री झोपण्यापूर्वी डोक्याला लावावी आणि सकाळी उठून डोके स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे. यामुळे डोक्यामध्ये असणारे सर्व कीटक नष्ट होतात.

तर मित्रांनो अशा प्रकारे सीताफळाचे आपणाला खूपच आरोग्याच्या दृष्टीने फायदे होतात. त्यामुळे सिताफळाचे सेवन नक्की करा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.