फक्त 2 रुपयांची तुरटी अशी वापरा आणि पहा घरातील व शेतातील उंदीर, घुस, कायमची पळवून लावा, फक्त 2 रुपयात !

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आलेले आहेत ज्यामुळे मनुष्य त्याच्या वापरामुळे आपले जीवन संपन्न करू शकतो परंतु आपल्यापैकी अनेकांना यापासून बद्दल फारशी माहिती नसते अशा वेळी आपण त्यांचा व्यवस्थित उपयोग करत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकरी खूप कामामध्ये असतो. शेतीची लागवड करणे, शेतामध्ये बी बियाणे करणे या सगळ्या कामांमध्ये तो मन लावून आणि जीवाची पराकाष्ठा करून शेतीची लागवड करत असतो.

परंतु अनेकदा या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक उपद्रवी प्राणी आपल्या आजूबाजूला सुद्धा पाहायला मिळतात त्यातील एक उपद्रवी प्राणी म्हणजे उंदीर. अनेकदा उंदीर आपल्याला घरामध्ये व शेतामध्ये पाहायला मिळतात. शेतामध्ये जर उंदीर सापडले तर उंदीर आपल्या पिकांची नासधूस करतात आणि यामुळे शेतकरी सतावतो अशा वेळी उंदरांचा नायनाट करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय सुद्धा करत असतो परंतु काही उपाय करून सुद्धा आपल्याला फारसा फरक जाणवत नाही.

तुमच्या घरात उंदीर वारंवार येत असतील किंवा तुमच्या शेतामध्ये जर उंदीर असतील आणि धान्याचे नुकसान करत असतील आणि जर तुमच्या घरात उपद्रव्य करत असतील तर आजचा लेख आपल्यासाठी आहे. उंदीर हे आपल्या घरात देखील उपद्रव्य करतात आणि शेतामध्ये आपण जे धान्य साठवून ठेवल आहे त्या धान्याची नासाडी सुद्धा करत असतात.तसेच धान्य व कपड्याचे नुकसान करत असतात. आपण आपल्या शेतातील अन्न वर्ष भरासाठी साठवून ठेवतो ते जर धान्य उंदीर खराब करत असतील किंवा या धान्याचे उंदीर नुकसान करत असेल तर अशा या उंदरापासून धान्याचा बचाव करण्यासाठी उपाय पहाणार आहोत.

यासाठी आपल्याला एक तुरटीचा खडा लागणार आहे. अगदी कमी किंमतीमध्ये फक्त 1 ते 2 रुपयाच तुकडा लागणार आहे. अशा या तुरटीच्या उपायाने आज आपण उंदीर व घुस यांच्या पासून आपण आपले होणारे नुकसान टळणार आहे. घुस सुद्धा आपल्या शेतातील भरपूर नुकसान करते. आणि मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला तुरटी घ्यायची आहे त्या तुरटीचे बारीक चूर्ण करून घ्यायचे आहे आणि या तुरटीच्या चूर्णानी आपल्याला हा उपाय करायच आहे. ज्य ठिकाणी जास्त उंदीर येतात, जास्त घुस येतात त्याठिकाणी या चूर्णाच्या मदतीने आपल्या धन्याची नासाडी थांबवायची आहे.उंदराची बीळ ज्याठिकाणी आहे किंवा घुसचे बीळ ज्याठिकाणी आहे त्याठिकाणी आपल्याला तुरटीचे चूर्ण त्या बिळात टाकायचे आहे.

मित्रांनो उंदीर ज्याठिकाणी सतत येतो दिसतो त्याठिकाणी हे तुरटीचे चूर्ण टाकायचे आहे. ज्याठिकाणी आपण तुरटीचे चूर्ण टाकतो त्याठिकाणी या तुरटीचा परिणाम असा होतो की या तुरटीचा वास सतत घेतला तर नाकात आणि गळ्यात सूज येते. जसे आपल्या माणसाच्या बाबतीत घडते तसेच उंदीर आणि घुस यांच्या बाबतीत सुद्धा असेच घडते तर यापेक्षा देखील जास्त त्रास यांना होतो. म्हणून ज्याठिकाणी तुरटीचे चूर्ण किंवा खडा ठेवला आहे अशा ठिकाणी उंदीर परत कधीच पाहायला मिळत नाही. आणि मित्रांनो तुम्ही हा उपाय एकदा नक्की करून पहा. याचा चांगला परिणाम सुद्धा पाहायला मिळेल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.