अक्कलकोट ते पुणे हायवेला घडलेली भयानक सत्य घटना, वाचून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही असा स्वामीं भक्ताला आलेला अनुभव ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण सर्वजण स्वामींचे भक्त आहोत स्वामींची पूजा प्रार्थना पण अगदी मनापासून करत असतो स्वामी आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही एकटे सोडत नाहीत हे आपल्याला माहीतच असतं आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर स्वामी आपल्या नेहमी पाठीशी असतात स्वामी नेहमी सांगत असतात की कोणत्याही संकटांना घाबरायचे नाही संकट कितीही मोठे असेल तरी आपण त्याच्या सामोरे जायचे आहे. स्वामींचं एक वाक्य नेहमी आपल्याला दिलासा देऊन जातो ते म्हणजे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपण कोणत्याही अडचणींना समस्यांना न घाबरता सामोरे जायचे आहे.

 

स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी लोक अनेक वेगळे प्रकारचे उपाय देखील करत असतात ते उपाय पूजा प्रार्थना मठामध्ये किंवा मंदिरामध्ये जाऊन देखील करत असतात त्यांचे पारायण जप हे देखील करत असतात तर मित्रांनो स्वामींचा अनुभव प्रत्येकालाच येतो असे काही नाही स्वामींची जे मनापासून भक्ती श्रद्धा करता स्वामी नेहमीच त्यांच्या पाठीशी असतात तर मित्रांनो आज असाच आपण एक भयानक असा अनुभव जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो हा अनुभव आहे तो म्हणजे सुधाकर मोरे या दादांना आलेला अनुभव आहे चला तर मग आता त्यांच्या भाषेतच आपण वाचूया पुणे हिंजवडी या ठिकाणी मी राहायला आहे.कुटुंबामध्ये माझी आई माझे वडील माझी मुलगी व माझी पत्नी एकत्रच राहत होतो.मी स्वामी भक्त आहे आणि स्वामींच्या कृपेने सर्व काही चांगलं चालू होतं आणि मी स्टेट बँकेमध्ये कॅशियर म्हणून कामाला आहे ही घटना तशी फार जुनीच आहे पण ही घटना मला आठवली तर माझ्या डोळ्यात पाणी येतो व मला माझ्या अंगावर शहारे देखील येतात.

 

या घटनेमधील मी कोणतीही गोष्ट विसरलेलो नाही तशीच घटना माझ्या डोळ्यासमोर नेहमी उभे राहते माझी आई वडील हे स्वामींचे भक्त होते त्याच्या नंतर मी देखील स्वामींचा सेवेकरी झालो माझी आई बाबांचे संस्कार ती स्वामी भक्त होते त्याच्यामुळे मी देखील स्वामीभक्त झालो आणि त्याच्यानंतर माझी पत्नी देखील स्वामी सेवेमध्ये आली त्याच्यानंतर माझी मुलगी देखील स्वामींची मनापासून प्रार्थना करत त्यामुळे आमचे पूर्ण कुटुंब हे स्वामींच्या सेवेमध्येच असल्यामुळे आमचे फार चांगले दिवस चालू होते सर्व काही सुखा समाधानाने चालू होतं फक्त मनामध्ये एक इच्छा फार काळापासून होते ती म्हणजे अक्कलकोटला जायचं होतं अक्कलकोटला मी गेलो नव्हतो असं काही नाही पण मी घरातल्यांसोबत आजपर्यंत कधीच गेलो नाही.

 

माझं लग्न झाल्यापासून मी एकदाही अक्कलकोटला गेलो नाही माझी बायको माझ्या मुलीने अक्कलकोट अजून बघितलेलं नाही आणि माझी ही खूप दिवसापासून इच्छा होती की अक्कलकोटला जाऊन यायचं तेवढ्यातच आम्ही मारुती अल्टो ही नवीन गाडी घेतली आणि मग विचार केला की नवीन गाडी घेतलीच आहे तर पहिल्यांदा अक्कलकोटला स्वामी समर्थांचे दर्शन घ्यायला जायचं एकदा का आपण कुठला जाऊन आलो तर आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती किंवा अडचणी येणार नाहीत असा माझा मी विचार करत होतो आणि त्याच्यानंतर अक्कलकोटला जायचं आम्ही ठरवलं होतं आणि शनिवारचा दिवस बघून आम्ही अक्कलकोटला निघालो होतो.

 

दुपारी आम्ही 11 ते साडेअकरा वाजता अक्कलकोटला जायला निघालो होतो जाताना आम्ही अत्यंत व्यवस्थित गेलो काहीही आम्हाला अडचणी आल्या नाही कारण घरामध्ये जी स्वामींची मूर्ती होती की त्या स्वामींच्या मूर्तीला मी सांगितलं होतं की स्वामी मी तुमच्या आता दर्शनाला येत आहेत मला सुखरूप आणण्याची जबाबदारी तुमची आहे असं मी नेहमीप्रमाणे स्वामी सोबत गप्पा मारत होतो आणि त्याच्यानंतर ना आम्ही निघालो आणि इथून म्हणजे घरापासून अक्कलकोट पर्यंतचा प्रवास आमचा अत्यंत सुखाचा झाला आम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्या आल्या नाहीत पण का कुणास ठाऊक जेव्हा मी गाडीत बसलो त्यावेळेस माझ्या मनामध्ये नकारात्मकता येत होती काहीतरी वाईट होईल असा विचार वारंवार मनामध्ये येत होता पण मी याकडे फार लक्ष दिलं नाही.

 

 

दुर्लक्ष करत राहिलो कारण गाडी नवीन असल्यामुळे मला अपघाताची भीती वाटत होती असं माझ्या मनामध्ये मी विचार केला. त्यादिवशी आम्ही अक्कलकोट होऊन निघालो नाही त्या दिवशी आम्ही तिथेच राहिलो दुसऱ्या दिवशी देखील माझा पाय तिथून निघत नव्हता म्हणजेच की अक्कलकोट सोडून जाऊ असं वाटत नव्हतं आईच्या आणि पत्नीच्या आग्रहामुळे दिवसभर तिथे राहण्याचा आम्ही विचार केला आणि आम्ही दिवसभर तिथेच थांबलो आता संध्याकाळचे पाच वाजले होते तरी आमचा पाय तिथून निघत नव्हता आणि त्याच्यानंतर कितीही म्हटलं जायचं नाही तर कधी ना कधी जावंच लागणार होतं

 

तिथून आम्ही अक्कलकोट मधून निघालो निघत असतानाच मला माझ्या मनामध्ये अनेक वाईट विचार येत होते मनामध्ये भीती निर्माण झाली होती का कुणास ठाऊक पण अचानक माझ्या गाडीचा स्टेरिंग कोणतरी खेचत आहे असं मला भास होतो तो पण तरीही मी स्वतःचा स्वतःचा मनावर ताबा ठेवून गाडीवर पूर्ण लक्ष किंवा साधारण रात्रीचे दहा वाजले होते त्याच्यानंतर न मला वॉशरूमला आलं म्हणून मी गाडी थांबवली गाडी साईटला घेऊन मी आई-वडिलांना आणि पत्नीला सांगून सांगितले की थोड्या वेळामध्ये मी येतो असं सांगून मी वॉशरूमला गेलो तिकडून मी परत आल्यानंतर गाडीमध्ये कोणीही नव्हते .

 

मला असे वाटले की थोडे हवा खायला गेली असतील म्हणजेच गाडीत बसून वैताग कंटाळा आला असेल म्हणून थोडं बाहेर फिरायला गेले असतील म्हणून मी इकडे तिकडे बघू लागलो पण त्या ठिकाणी मला कुठेच ते दिसले नाहीत म्हणून मी अजून थोडे दूर अंतरावर जाऊन बघितलो पण मला ते कुठेच दिसले नाहीत थोड्या दूर अंतरावर मला ते दिसले व ते चौगेही चालत होते आणि मी त्यांना मागून आवाज देत होतो पण त्यांच्यातले कोणी माझ्याकडे लक्ष देत नव्हतं .

 

एकही मागे मान करून बघत नव्हतं त्यांचं ते पुढे पुढे चालत जात होते आणि मी त्यांच्या मागे मागे लांब पर्यंत चालत होतो पण एकदाही त्यांनी माझ्याकडे बघितले नाही पण अचानक माझ्या मनात आले की ही जी घटना घडत आहे ती साधारण नाही किंवा हे वेगळच काहीतरी घडत आहे चकवा देणारी गोष्ट आहे अशी ही मला त्यावेळेस आठवलं त्यावेळेस माझ्या खिशामध्ये स्वामी समर्थांच्या अक्कलकोट मध्ये असलेली विभूती आहे आणि ती विभूती होती ती मी पटकन खिशामधून बाहेर काढलो आणि ते चौघेजण चालत होते त्यांच्या अंगावर मी खूंखार होऊन दिले ते अंगावर फुंकर ता ते चौघेजण भानावर आले आणि ते माझ्यासोबत बोलू लागले की तिकडे काय करतोस आपण इकडे काय करते असे वेगवेगळे प्रश्न ते मला विचारू लागले .

 

मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे न देता त्या चौघांनाही पटकन गाडीमध्ये बसण्यासाठी सांगितलं आपल्याला निघायचं आहे आणि आपल्याला लवकर जायचं आहे आणि गाडीकडे पोहोचताच त्यावेळी जे घडलं ते बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती आणि गाडीमध्ये जाऊन बघतोय तर काय गाडीमध्ये माझी आई माझे वडील माझे पत्नी माझी मुलगी बसलेली होती जसं मी त्यांना सोडून गेलो होतो तसेच त्या अवस्थेमध्येच ते बसलेले होते आणि तेवढ्यात मी मागे वळून बघितलो तर माझ्या पाठीमागे कोणीही नव्हतं पुन्हा एकदा पुढे मागे असे दोन-तीन वेळा बघितलं तरी माझी आई वडील हे गाडीमध्ये बसलेले होते पत्नी आणि मुलगी हे देखील सुखरूपच होते असेच धापा टाकत घाबरत स्वामींचं नामस्मरण करत मी पटकन गाडीमध्ये बसलो .

 

 

आणि एकदम सुसाट मध्ये गाडी चालवत होतो माझी वडील मला विचारू लागले की अरे एवढी काय गडबड आहे एवढी का फास्ट मध्ये चालत असेल पण माझ्यासोबत जो प्रसंग घडला तो प्रसंग मी त्यांना थोडा देखील सांगितला नाही कारण ते अजून घाबरले असते म्हणून कसातरी मी तेवढी ती जागा तेवढा भाग सोडून पुढे जायचं होतं म्हणून मी नामस्मरण करून तेवढा रस्ता पार केला.एका सुरक्षित ठिकाणी येऊन पोहोचलो त्या ठिकाणी मला एक हॉटेलही दिसलं त्या हॉटेलवर येऊन आम्ही थांबलो त्या ठिकाणी आम्ही थोडसं जेवून घेतलं थोडा चहा वगैरे घेऊया असा विचार मी करत होतो आणि त्या ठिकाणी मी जेवताना माझ्यासोबत जो प्रसंग घडला जी घटना घडली ती माझ्या आई-वडिलांन आणि पत्नी सोबत शेअर केली.

 

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.