घराबाहेर लिंबू मिरची का टांगावी? याच दिवशी बांधा खूप मोटा होईल फायदा …..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपण सर्वांनी पाहिली असेल की काही जण हे अमावस्येला आपल्या घराबाहेर लिंबू आणि मिरची टांगतात. परंतु मित्रांनो काहीजण आपल्या घराबाहेर लिंबू मिरची हे टांगत नाहीत. परंतु लिंबू मिरची टाकण्यामध्ये नेमके कारण कोणते आहे हे आपल्याला माहीत नसते आणि मग आपण याला अंधश्रद्धा म्हणून हे सोडून देतो. तर मित्रांनो घराबाहेर लिंबू आणि मिरची का टांगावी? या मागचे नेमके कारण कोणते आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

तर मित्रांनो अनेक वेळा तुम्ही पाहिलंच असेल की अनेकजण हे आपल्या दुकानांवर किंवा वाहनांवर आणि घराच्या गेटवर किंवा दरवाजावर लिंबू मिरची टांगतात म्हणजेच लटकवतात. तर या मागचा हेतू त्यांचा कोणता असतो हे जाणून घेणे खूपच महत्त्वाचे असते.

मित्रांनो अशी परंपरा आहे की घराच्या गेटवर किंवा दुकानावर किंवा वाहनांवर जर लिंबू मिरची लटकवली तर यामुळे प्रगतीसाठी ज्या काही अडचणी, बाधा येत आहेत त्यातून सुटका होते. तसेच दुकानाबाहेर किंवा घराबाहेर लिंबू मिरची बांधली की कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये किंवा आपल्या दुकानांमध्ये प्रवेश करत नाहीत. म्हणजेच वाईट शक्ती या दुकानांपासून तसेच घरापासून दूर राहतात.

तसेच मित्रांनो लिंबू आणि मिरची घराबाहेर लटकवल्याने आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत नाही. म्हणजेच मित्रांनो लिंबू आणि मिरची हे अलक्ष्मीचे खाद्य असल्याने लिंबू आणि मिरची ग्रहण करून ती अलक्ष्मी आपल्या घराबाहेरूनच निघून जाते. म्हणजेच ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही.

अनेकांच्या मते, लिंबू मिरची लटकवल्यानं वाईट नजरेपासून रक्षण होतं. लिंबूचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा वाईट नजरेचा प्रभाव कमी करतो. पण याचं वैज्ञानिक कारण तुम्हाला माहीत आहे का? तर हे जाणून घेऊया.

दारावर लिंबू मिरची लटकवण्यामागेही शास्त्र आहे. वास्तविक, मिरची, लिंबू यांसारख्या वस्तू पाहिल्यावर त्याची चव आपल्याला मनाला जाणवू लागते, त्यामुळे आपण ती फार काळ बघू शकत नाही आणि लगेच आपले लक्ष तिथून हटवतो.

तसेच मित्रांनो लिंबू आणि मिरची ही आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही खूपच फायदेशीर असते. लिंबू खूपच आंबट आणि मिरची तिखट असते. त्यामुळे मग दुकानाबाहेर किंवा घराबाहेर प्रवेशद्वारात बांधली जाते. तेव्हा त्याचा जो मजबूत वास आहे या वासामुळे जे काही मच्छर, किडे, माशा या आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत. आपल्या घरातील एकूणच जे वातावरण असते ते वातावरण शुद्ध होते आणि आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आरोग्याचे हे रक्षण होते.

लिंबू मिरचीमध्ये कीटकनाशक गुणधर्म असतात. ज्यामुळे वातावरण शुद्ध राहते. जिथे लिंबूचे झाड असते तिथे त्याच्या आजूबाजूची ठिकाणे अगदी शुद्ध राहतात. वास्तुशास्त्रानुसार ज्या घराजवळ लिंबूचे झाड असते ते घर पूर्णपणे शुद्ध मानले जाते. लिंबूच्या आत नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असते.

तर मित्रांनो वरीलपैकी सर्व धार्मिक आणि वैज्ञानिक कारणांमुळे घराबाहेर लिंबू आणि मिरची लटकवतात. म्हणजेच आपले वाईट शक्तींपासून संरक्षण होते. कोणतीही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. तसेच आपले आरोग्याच्या बाबतीत देखील ही लिंबू मिरची खूपच फायदेशीर ठरते. तर मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या घराबाहेर लिंबू मिरची अवश्य लटकवा.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.