गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी, गणपती बाप्पा घरी आल्यानंतर चुकूनही करू नका ही 7 कामे नाहीतर घर होईल बरबाद ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, सगळीकडे गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे. गणपतीच्या आगमनाने संपूर्ण वातावरण आनंदीमय व उत्साहपूर्ण असते. गणेश चतुर्थीपासून ते अंनत चतुर्थी पर्यंत गणपती बाप्पा आपल्या घरात येतात. आपल्या घरी मुक्काम करतात ह्या १० दिवसाच्या कालावधीत प्रेत्येक जण बाप्पांची आराधना करतो पूजा करतो. गणपती बाप्पांची कृपा दृष्टी आपल्यावरती व्हावी घरात सुख समृद्धी नांदावी अशी प्रेत्येकाचि इच्छा असते. जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरात विराजमान आहेत त्या कालावधीत आपण काही नियमांचे पालन अगदी काळजीपूर्वक करायलाच हवे जेणेकरून ते आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्यांचा क्रोध उत्पन्न होणार नाही आणि मित्रांनो ह्यातील पहिली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती आपण स्थपन करताना आपण ती अश्या प्रकारे स्थापन करावी कि, बाप्पाची पाठ आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीला दिसू नये.

कारण मित्रांनो गणपतीच्या पाठीत दरिद्रता म्हणजेच अलक्ष्मी देवीचा वास आहे. जर चुकून आपण ह्या गणपतीच्या पाठीचे दर्शन घेतले किंवा आपली वारंवार त्याकडे दृष्टी जात असेल तर त्यामुळे घरात दरिद्रता निर्माण होऊ शकते. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट, ह्या १० दिवसांच्या कालावधीत आपण गणपती बाप्पांची आरती ओवाळताना आपण काळ्या किंवा निळ्या रंगाचा वापर आपण करू नका. लाल आणि पिवळा हे दोन रंग गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहेत. म्हणून आपण ह्या रंगांची कपडे परिधान करू शकता. मित्रांनो काही वेळा अनावधानाने आपण तुळशीची पाने आपण चुकून आपण अर्पण करता तर अशी चूक आपण करू नका.

मित्रांनो हिंदू धर्म शास्त्रात अशी एक कथा आहे कि तुळशीने भगवान श्री गणेशांसोबत विवाह करण्यास नकार दिला तेव्हा गणपतींनी तुळशीला श्राप दिला होता. थोडक्यात श्री गणेश आणि तुलसी माता ह्यांच्यात सख्य नसल्याने तुळशीची पाने आपण चुकणंही अर्पण करू नका. मित्रांनो आपण गणपती बाप्पांना रुईची पाने किंवा मंदार वृक्षाची पाने खूप प्रिय आहेत सोबत तुम्ही त्यांना शमीची पाने देखील अर्पण करू शकता आणि मित्रांनो एकदा आपल्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर, आपल्या घराचा मुख्य दरवाजा बंद करून आपण बाहेर जाऊ नका.

म्हणजेच घराला कुलूप लावून बाहेर जाण्यास धर्मशास्त्र मनाई करते. आपल्या घरात जितक्या व्यक्ती आहेत त्यातील एखाद्या व्यक्तीने तरी सैदव घरात राहावे. मित्रांनो गणेश चतुर्थी दिवशी चंद्राचे दर्शन घेणे निषध्द मानले आहे, जी व्यक्ती ह्या दिवशी चंद्राचे दर्शन करते त्या व्यक्तीवर कोणत्या ना कोणता खोटा नाटा आळ त्यांच्यावर नक्की येतो आणि जो गुन्हा त्या व्यक्तीने केलेला नाही त्यात ती व्यक्ती अडकते. म्हणून चंद्र दर्शन हि व्यक्ती कलंक आपल्या माथी लावू शकते म्हणून ते निषिद्ध आहे. मित्रांनो आपण गणपती बाप्पांची पूजा आपण ह्या दहा दिवसात करत आहोत.

तर मित्रांनो ह्या दिवसांत आपण कोणत्याही प्रकारचे मांसाहार घरात शिजवला जाणार नाही तसेच घरातील कोणत्याही व्यक्तीने ते खाऊ देखील नये. आणि मित्रांनो आपले जे जेवण आहार असेल तो सात्विक असावा. कोणत्याही प्रकराची व्यसने आपण ह्या १० दिवसांच्या कालावधीत करू नयेत. खोटे बोलणे, घरात वादविवाद करणे ह्या गोष्टी गणपती बाप्पाना क्रोधीत करतात. म्हणून ह्या दिवसात आपण चुकणंही भांडणे करू नयेत. अनेकजण तर ह्या दिवसांत लसूण आणि कांदा देखील खात नाहीत, जर तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही हे देखील पाळा.

मित्रांनो अनेकजण घरात जे काही शिजवले जाते त्याचा पहिला भोग बाप्पाना नैवद्य म्हणून दाखवतात आणि त्यानंतर त्याचे सेवन करतात. आपण देखील ह्या नियमाचे पालन करावे. ह्या १० दिवसाच्या कालावधीत आपण सातत्याने सकरात्मक गोष्टींचा विचार करायला हवा, कोणत्याही प्रकारे वाईट बोलणे शिव्या देणे ह्या गोष्टी टाळाव्यात. त्याचबरोबर मित्रांनो ज्या वेळी गणपती बाप्पांच्या आगमन आपल्या घरामध्ये होते त्या दिवशी किंवा तुम्हाला ज्या दिवशीही शक्य होईल त्यावेळी तुम्हाला गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो या काळामध्ये त्यांना जास्वंदाचे फुल हे आपल्याला अर्पण करायचे आहे. मित्रांनो गणपती बाप्पांना मोदक खूप प्रिय आहेत त्यामुळे मोदकाचा नैवेद्य बाप्पांना जरूर दाखवावा.

मन शांत ठेवावे, गणपती बाप्पाचे ध्यान करावे. तर मित्रांनो ह्या काही नियमांचे पालन आपण अवश्य करावे.

 अश्याच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.