या पाच रोगांसाठी वरदान आहे अंजीर खाने एकदा नक्की पहा कोणी खावे कोणी नाही महत्वपूर्ण अशी माहिती …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येक जण व्यस्त झालेला आहे आणि या सर्व गोष्टींमुळे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते यामुळेच आपल्याला अशक्तपणा थकवा जाणवतो यामागे कारण सुद्धा वेगवेगळे असतात. परंतु अनेकदा आपल्या शरीरामध्ये योग्य ते पोषक तत्व उपलब्ध नसल्याने सुद्धा आपल्याला थकवा अशक्तपणा जाणवत असतो. आपण अनेकांच्या सांगण्यावरून वेगवेगळे पदार्थ सेवन करत असतो आणि आपल्यातील बरेच ड्रायफ्रूट खात असतो परंतु नेमके कोणते पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीराला फायदे होतात.

आणि हे काही आपल्याला कळत नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. त्या माहितीच्या आधारे तुमच्या शरीराला उत्तम पोषक द्रव्य प्राप्त होणार आहेत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल. मित्रांनो या फळाचे नाव आहे अंजीर. अंजीर आहे उंबरसारखे दिसायला फळ आहे. हे फळ बाराही महिने उपलब्ध राहत नाही, जरी हे फळ फ्रेश प्रमाणामध्ये उपलब्ध राहत नसले तरी अनेकदा ड्रायफूटच्या दुकानांमध्ये आपल्याला सुकविलेले अंजीर फळ सहज उपलब्ध होऊन जाते.या फळाच्या अंगी असे अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराला अत्यंत महत्त्वाचे असतात. आपण अनेकदा बाजारामध्ये अंजीर पासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ खात असतो.

हॉटेलमध्ये सुद्धा आपल्याला अंजीर मिल्क शेक, अंजीर बर्फी, अंजीर जाम असे पदार्थ आपल्याला पाहायला मिळतात.या फळांमध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम, लोह भरपूर प्रमाणामध्ये असते म्हणूनच आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करण्याचे कार्य हे फळ मोठ्या प्रमाणावर करते. मधुमेही रुग्ण असणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा हे फळ नक्की खायला हवे आणि जेव्हा आपल्याला बाजारामध्ये सुकलेल्या स्वरूपामध्ये हे फळ प्राप्त होत असते तेव्हा सर्वप्रथम आपल्याला रात्रभर हे फळ सुकवायचे आहे आणि त्यानंतर सकाळी उठल्यावर याचे सेवन करायचा आहे कारण की या फळांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता असते आणि म्हणूनच अनेकदा डॉक्टर सुद्धा आपल्याला हे फळ रात्रभर भिजवून सकाळी खाण्याचे सल्ला देतात.

अंजीर हे रक्त शुद्ध करण्याचे कार्य करते. बहुतेक वेळा आपल्या शरीरामध्ये जे रक्त उपलब्ध असते त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले तर अनेकदा आपल्याला पित्त, चेहऱ्यावर काळे डाग, पिंपल्स वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. अशावेळी अंजीर हे फळ ब्लड पुरिफिकेशन म्हणजे रक्त शुद्धीकरण करण्याचे कार्य करते. महिलांच्या मासिक पाळीच्या समस्येवर अंजीर फळ उत्तम ठरते आणि ज्या व्यक्तींना दम्याचा त्रास आहे अशा व्यक्तीने दिवसभरातून दोन अंजीर जरूर खायला हवे कारण की अंजीर हे कफनाशक आहे आणि म्हणूनच दम्याच्या व्यक्तींनी हे खायला हवे.

आणि मित्रांनो तुम्ही दिसायला अत्यंत बारीक असाल,काही खाल्ले तरी अंगाला लागत नाही तर अशावेळी आपले शरीर धष्टपुष्ट बनवण्यासाठी सुद्धा अंजीर मदत करते म्हणून आपल्याला दिवसभरातून दोन तरी अंजीर खायचे आहे आणि जर तुमचे पोट साफ होत नसेल तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर अशा वेळी रोज झोपताना दुधासोबत अंजीर चाऊन खायचे आहे असे केल्याने आपल्या पोटातील जीवजंतू सुद्धा नष्ट करण्याची शक्ती अंजीर मध्ये आहे आणि त्याचबरोबर आपले पोट सुद्धा स्वच्छ राहते त्याचबरोबर अंजीर मध्ये अनेक असे काही पौष्टिक घटक उपलब्ध असल्याने आपल्या शरीरामध्ये नेहमी शक्ती संचार करण्याचे कार्य अंजीर करत असते यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा उत्तम बनते म्हणूनच अंजीर चा समावेश आपल्या पौष्टिक आहारामध्ये अवश्य करायला हवा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.