ही 21 स्वप्ने कुणालाही सांगू नका… तुम्ही लवकरच श्रीमंत बनणार आहात…!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपल्याला तर माहीतच आहे की आपला सर्वांना स्वप्नही पडत असतात. ती काही भयानक असतात. तर ती काही चांगली देखील असतात. या स्वप्नांबद्दल आपण आजच्या लेखांमध्ये माहिती घेणार आहोत. की काही स्वप्न असे असतात की ज्यामुळे आपला आयुष्यात खूप चांगली प्रगती होणार असते. आपण आपल्या आयुष्यामध्ये धनवान बनणार असतो. माझे ते संकेत देतात. अशी ही कोणती स्वप्न आहेत? याची माहिती आज आपण घेणार आहोत.

 

असे म्हटले जाते की, पहिला प्रहरामध्ये पडणारे स्वप्न हे त्याचे फळ एका वर्षाच्या कालावधीमध्ये देत असते. दुसऱ्या प्रहरामध्ये पडणाऱ्या स्वप्नाचे फळ हे सहा महिन्याच्या कालावधीत येत असते. तिसऱ्या प्रहरात पडणारे स्वप्न हे एका महिन्याच्या कालावधीमध्ये त्याचे फळ देते. तर चौथ्या प्रहरात पडणाऱ्या स्वप्नांचे फळ हे लगेचच आपल्याला मिळत असते. चौथा प्रहर म्हणजे सकाळ सकाळच्या वेळेला जे आपल्याला स्वप्न पडते त्याचे फळ आपल्याला लवकरात लवकर मिळते.

 

काही स्वप्न असे असतात की जे आपल्या आयुष्यात येणाऱ्या शुभ संकेत आपल्याला देत असतात. ही जर स्वप्न तुम्हाला पडली तर आपण पुन्हा झोपी जाऊ नये. या स्वप्नाची माहिती नसल्यामुळे आपण पुन्हा झोपी जातो. परंतु आपण असे पडलेले स्वप्न हे कोणाला सांगायचे देखील नसते. कारण या स्वप्नामुळे आपण भविष्यात धनवान बनणार असतो. हे पडणारे स्वप्न त्याचे संकेत आपल्याला देत असतील म्हणून ते कोणाला सांगायची नसते. परत झोपी देखील जायचे नसते. म्हणूनच आज आपण हे कोणती स्वप्न आहेत ती आता आपण जाणून घेऊया.

 

जर तुम्हाला स्वप्नामध्ये अशोक, चाफा, चंदन, गुलबक्षी, सुपारी, नारळ किंवा अक्रोडाचे झाड जर दिसले तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही लवकरात लवकर धनवान होणार आहे. जर स्वप्न तुम्हाला पडले तर तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही कामांमध्ये कमी पडू नका. सतत काम करत राहा नक्कीच तुम्हाला भविष्यात त्याचा फायदा झालेला नक्की दिसून येईल. दुसरे स्वप्न म्हणजे जर तुम्हाला वेलची, लवंग, जायफळ आणि कापूर हे पदार्थ पाहत आहोत किंवा खात आहोत असे स्वप्न जर पडले तरी याचा देखील अर्थ आपण धनवान होणार आहोत असा होतो.

 

गुलाब, बकुळा, केवडा, जुई, बेला यांची फुले जर दिसली तर हे देखील स्वप्न धनलाभ होण्याचे आहे. जर आपले केस गळत आहेत आणि डोक्याला टक्कल पडत आहे असे जर आपण स्वप्नात पाहिले असेल तर यामुळे आपल्याला शंभर टक्के धनप्राप्तीचे लाभ होणार आहे. विड्याची पाने जर आपण खाताना स्वतः पाहिले तर हा देखील एक धनलाभ होण्याचा संकेत आहे. जर स्वप्नामध्ये तुम्ही हत्तीवर चढताना पाहिले आणि जर तुम्ही भीला नाही तर याचा अर्थ असा होतो की लक्ष्मी माता तुमच्यावर प्रश्न झाले आहे. लक्ष्मीच्या आगमन तुमच्या घरामध्ये होणार आहे.

 

स्वतःला नदीमध्ये स्नान करताना पाहिले तर हे देखील एक शुभ स्वप्न मानले जाते. एखादे फळ किंवा फुल खाताना जर तुम्ही स्वप्न मध्ये पाहिले तर हे देखील धनलाभ होण्याचे स्वप्न आहे. स्वप्नामध्ये तुम्ही एखाद्याची हत्या करत आहात किंवा निंदा करत आहात किंवा साखळीने बांधताना तुम्ही पाहिले तर हे देखील धनलाभ होण्याचे स्वप्न आहे. स्वप्नामध्ये एखादी तलाव पाहणे हे देखील धनप्राप्तीचा संकेत आहे. त्याचबरोबर स्वप्नामध्ये ध्वज फडकताना पाहिले तर याचे दोन अर्थ होऊ शकतात. एक तर तुम्हाला संतती प्राप्ती होऊ शकते. किंवा तुम्हाला धनलाभ होऊ शकतो.

 

स्वतःचा जलाभिषेक होताना जर तुम्ही स्वप्नामध्ये पाहिले तर तुम्हाला गुप्तधन सापडणार आहे. असा संकेत असतो. स्वप्नामध्ये स्वतःला पूर्व दिशेला जाताना पाहणे हा देखील धनलाभ होण्याचा संकेत आहे. स्वप्नामध्ये स्वतःला लढताना तलवारीने लढताना पाहणे हे देखील धनलाभ होण्याची संकेत आहे. त्याचबरोबर स्वतःला एखाद्या पर्वतावर एखादा महलात किंवा उंच ठिकाणी जाताना पाहणे हे देखील अचानक मोठे धनलाभ होण्याचा संकेत आहे. आकाशामध्ये पक्षी उडताना पाहणे हे देखील शुभ स्वप्न मानले जाते.

 

त्याचबरोबर पांढऱ्या रंगाचा बैल पाहणे किंवा त्याला पूजा करताना पाहणे हे देखील गुप्तधन सापडण्याचे लक्षण आहे. बैलावरती स्वतः बसून जाताना पाहिले तर त्यातला अर्थ असा होतो की आपल्याला मोठे धनप्राप्ती होणार आहे. स्वप्नामध्ये मासे पाहणे किंवा मासे विक्री करणारा कोळी पाहणे. त्याचबरोबर मासे खरेदी करू ते करून एखादा व्यक्ती जाताना पाहणे हे देखील शुभ संकेत आहेत. त्यामुळे तुम्हाला अचानकपणे धनलाभ होणार आहे आणि तुम्ही करत असलेला कामांमध्ये यश प्राप्ती होणार आहे.

 

स्वप्नामध्ये स्वतःचे रक्त पाहणे हा देखील शुभ संकेत मानला जातो. स्वप्नामध्ये जर समुद्र दिसला तर हा लक्ष्मी माता ची कृपा आपल्यावर होणार आहे व आपल्याला भरघोस पैसा मिळणार आहे. असा संकेत होतो. जर आपल्याला सापाने चावले असे स्वप्न पडले तर हा देखील धनप्राप्तीचा संकेत मानला जातो.

 

अशाप्रकारे ही काही स्वप्न आपल्याला भविष्यात येणाऱ्या धनप्राप्तीचे संकेत देत असतात. परंतु असे स्वप्न पडले तर आपण हे कोणालाही सांगू नये आणि स्वप्न पडल्यावर पुन्हा झोपू नये. असे केल्यावरच आपल्याला त्याचे फळ मिळत असते.

 

तुम्हाला देखील हे स्वप्न पडत असतील तर नक्कीच समजून जा की तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे. तुम्ही लवकरात लवकर श्रीमंत होणार आहात.

Leave a Reply

Your email address will not be published.