मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की श्री स्वामी समर्थांची सेवा अनेक संकटातून मुक्तता मिळवून
देणारी असते, असा अनुभव अनेक सेवेकऱ्यांना येत असतो. श्री स्वामी समर्थांचे अनेक रूपं देखील पाहायला
मिळतात, लहान मुलांसोबतचे खेळणे असो किंवा प्राणी मात्रांवरचे प्रेम असो स्वामींच्या अनेक कथा आहेत. आज त्यांच्या लाडक्या गाय सोबतचा किस्सा आणि प्रचिती आलेल्या एका पुजाऱ्याचा अनुभव जाणून घेऊया…
मित्रांनो आपले स्वामी कायमच लहान मुलांबरोबर आंधळी कोशिंबीर, लपाछपी आणी गोट्या खेळत. त्यांना प्राणीही फार प्रिय. नंदा नावाची गाय त्यांची आवडती होती. असे मानले जाते. स्वामी तिला प्रेमाने भरवत मग ती सुद्धा स्वामींना आपल्या जिभेने खराखरा चाटे. स्वामी कधी कधी तिच्या चार पायांमध्ये जाऊन बसत आणी तिच्या आचळाना तोंडाने दुशी देत मग ती सुद्धा आपला पान्हा स्वामींसाठी मोकळा करे. धारोष्ण दूध मनसोक्त पिऊन झाल्यावर स्वामी नंदा गायीला मिठी मारून “माझी माय ग ती” असं म्हणत अन दुधाने माखलेल्या आपल्या अंगाकडे पाहत स्वतःच हसत.
आणि त्यानंतर एके दिवशी स्वामी भक्तांना विचारतात:- “आम्ही कोण आहे?’ चोळप्पा उत्तर देतात:- “आपण त्रिभुवन नायक आहात !” स्वामी संतुष्ट होत नाही. स्वामी म्हणतात:- “आज जर बाळप्पा असता तर त्यांनी अचूक उत्तर दिले असते.” स्वामींचा यशवंत नावाचा एक शिष्य मंगळवेढ्याला मामलेदार होता. त्या वेळेला मंगळवेढ्याला दुष्काळ पडला होता. लोकं अन्न-पाण्यालापारखे झाले होते.लोकांचे हाल पाहून यशवंताच्या घशातून अन्न उतरत नव्हते. इकडे स्वामींकडे गाणगापूर मंदिराचा पुजारी,
स्वामींची परीक्षा पहायला आला होता.
आणि त्यानंतर ‘स्वामी स्वताला दत्त अवतार असल्याची हवा पसरवून लोकांना भ्रमित करतात’, असं त्याचं मत होतं. आल्या-आल्या, तडका-फडकीनी तो वट-वृक्षा खाली बसलेल्य स्वामींकडे येतो. आणि त्याला पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात:- “काय रे ! गाणगापूर मंदिराचा तु पुजारी ना!” “आम्ही कोण ही परीक्षा घ्यायला आला ना?” पुजारी चपापतो पण स्पष्टपणे कबुली देतो. मग स्वामी विचारतात- “गाणगापूरला कोणाची भक्ती करतो?” पुजारी
उत्तर देतो की “श्रीनरसिंहसरस्वतीची भक्ती व पूजा मी करत असतो.
आणि त्यानंतर त्याला स्वामी म्हणतात- आंम्ही नरसिंहभान आहो! नीट बघ आम्हाला! पुजारी पाहतो तर काय स्वामींच्या जागेवर साक्षात नरसिंहसरस्वती उभे आहे. पुजाऱ्याला गहिवरून येतं. काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्रीवल्लभ दिसतात. पुजाऱ्याला पूर्ण प्रचीती येते कि स्वामी साक्षात दत्त अवतार आहे. तो स्वामी चरणी मस्तक ठेऊन क्षमा मागतो आणि त्यानंतर मग म्हणतो- “अक्कलकोट हेच गाणगापूर व गाणगापूर हेच अक्कलकोट आहे !” श्री स्वामी समर्थ!
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.