रागावर नियंत्रण ठेवा… रागाला जिद्दीत बदला, आयुष्य बदलेल.. एका वकिलाने सांगितलेला हृदयस्पर्शी किस्सा नक्की वाचा ?

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, राग हा आपल्या आयुष्यासाठी खूप वाईट असतो. कारण रागाच्या भरात व्यक्ती कोणताही प्रकारचा निर्णय घेऊ शकते. तो आपल्या जीवनासाठी अतिशय घातक ठरू शकतो. म्हणूनच आपल्याला रागावर नियंत्रण ठेवणे अतिशय गरजेचे असते. जर आपल्याला आपला जीवनामध्ये काहीतरी साध्य करायचं असेल तर आपला राग हा ताल्यात ठेवणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच आज आपण या रागावर नियंत्रण करण्याची एक सुंदर उदाहरण म्हणून एक कथा पाहणार आहोत.

 

रागावर नियंत्रण करण्याचे एक सुंदर उदाहरण एका वकीला ने सांगीतलेला आहे. ‘हृदयस्पर्शी किस्सा’ आपण या कथेतून जाणून घेऊया. ते वकील म्हणतात, “नेहमीप्रमाणे बसलो होतो. एक पक्षकार आले. हातात कागदाची पिशवी. रापलेला चेहरा. वाढलेली दाढी. मळलेली कपडे. म्हणाले, ” सगळ्या च जमीनीवर स्टे लावायचा आहे. आणखी काय कागदं पाहीजेत? किती खर्च येईल? ” मी त्यांना बसायला सांगितलं. ते खुर्चीवर बसले. त्यांची सर्व कागदपत्रे तपासली. त्यांच्या कडून माहीती घेतली. अर्धा पाउण तास गेला. मी त्यांना सांगितलं., ” मी अजून कागदपत्रे पाहतो. तूमच्या केसचा विचार करूया. तुम्ही असं करा ४ दिवसांनी परत या. ”

 

४ दिवसांनी ते पक्षकार पुन्हा आले. तसाच अवतार. भावा बद्दलचा राग अजूनही कमी झाला नव्हता. मी त्यांना बसायची खूण केली. ते बसले. मग मीच बोलायला सुरूवात केली. ” मी तुमची कागदपत्रे पाहीली. तुम्ही दोघे भाऊ. एक बहीण. आई वडील लहानपणीच गेले. तुमच शिक्षण ९ वी पास. धाकला भाऊ M.A.B.ed. तुंम्ही भावाच्या शिक्षणा साठी शाळा सोडली. रानात लंगोटी वर राबला. नेवरा दाजी च्या विहीरीवर दगड फोडली. सदाबापू च्या उसात च-या पाडल्या.

 

पण भावाच्या शिक्षणाला पैसा कमी पडू दिला नाही. एकदा बहीण शेतात गुरं चारत होती. तुमचा भाऊ शाळेतून आला होता. कसा तो म्हशीच्या आडवा गेला आणि त्याला शिंग लागली संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं. तुम्ही खांद्या वरून त्याला बोरगावला नेलं. खरं म्हणजे त्यावेळी तुमचं पण कळतं वय नव्हतं. फक्त कळती माया होती.आई बापाच्या मागं यांचा मीच आई बाप ही भावना होती. तुमचा भाऊ B.A ला गेला. उर भरून आला.

 

तुम्ही पुन्हा जोमानं कष्ट उपसायला लागला. पण अचानक त्याला किडनीचा त्रास सुरू झाला. दवाखानं केल. बाहेरचं केलं. पण गुण आला नाही. शेवटी डॉक्टर नं किडनी काढायला सांगितली. तुंम्ही तुमची किडनी दिली. ऑफिसर झाल्यावर खुप फिरायच आहे. नोकरी करायची आहे. तुला आमच्या पेक्षा लय त्रास. आंम्ही रानातली माणसं. आंम्हाला एक किडनी असली तरी चालतय. असं तुम्ही त्याला म्हटले. तुम्ही बायकोच सुध्दा न ऐकता किडनी दिली.

 

भाऊ M.A ला गेला. होस्टेल वर रहायला गेला. गावात मटण पडलं. डबा नेवून द्यावा. शेतात कणसं आली. कणस नेवून द्यावी. कुठला सण आला. पोळ्यांचा डबा द्यावा. घरा पासून हॉस्टेल च अंतर २५ की.मी.पण तुंम्ही सायकलने गेला. घासातला घास घातला. भावाला नोकरी लागली. तुम्ही गावात साखर वाटली. ३ वर्षीपुर्वी त्याचं लग्न झालं . झालं म्हणजे त्यानंच केलं. तुम्ही फक्त हजर होता. पण तरी अभिमान होता.

 

भावाला नोकरी लागली. भावाच लग्न झालं. आता तुम्हाला आणि बायका पोरांना सुख लागणार होतं; पण झाल उलटंच. तो पटकन म्हणाला; हो बरोबर. वकील म्हणले, स्टे लावता येईल. भावाने खरेदी केलेल्या मिळकती मधला हिस्सा पण मिळेल. पण तुंम्ही दिलेली कीडनी परत मिळणार नाही. तुम्ही भावासाठी आटवलेलं रक्त परत मिळणार नाही. तुम्ही त्याच्या साठी खर्च केलेलं आयुष्य पण परत मिळणार नाही. आणि मला वाटतयं या गोष्टी पुढं त्यानं घेतलेल्या फ्लॅटची किंमत शुन्य आहे.

 

त्याची नियत बदलली. तो त्याच्या वाटंनं गेला. तुम्ही त्याच वाटेनं नको जाऊसा. तो भिकारी निघाला. तुम्ही दिलदार होता. दिलदारच रहा. तुम्हाला काही एक कमी पडणार नाही. उलट मी म्हणेन वडीलो पार्जित मिळकती मधला तुमचा हिस्सा तेवढा पेरा. त्याचा हिस्सा पडीक राहु द्या. कोर्ट कचेरी करण्या पेक्षा मुलांना शिकवा. शिकुन तुमचा भाऊ बिघडला, म्हणुन पोरं बिघडणार नाहीत.” त्यान १० मिनीटं विचार केला. सगळी कागद पिशवीत कोंबली. डोळं पुसत म्हणाला, ” चलतो सायेब… !! ”

 

या गोष्टीला ५ वर्षे झाली. परवा तो पक्षकार अचानक ऑफीस ला आला. बरोबर गोरागोमटा पोरगा. हातात कसली तरी पिशवी. वकील ताला म्हटले, बसा.. तो म्हणाला, “” बसायला न्हाय आलो सायेब, पेढं द्यायला आलोय ” “.हा माझा पोरगा. न्युझिलँन्डला असतो. काल आलाय. आता गावात ३ मजली घर हाय. ८-९ एकर शेत घेतलय. तुम्ही म्हणाला होता कोर्ट कचेरी च्या वाटला लागु नका. मी पोरांच्या शिक्षणा ची वाट धरली.. !! ”

 

त्या व्यक्तीला ला भरुन आलं…हातातला पेढा हातातच राहीला…” रागाला योग्य दिशा दिली तर पुन्हा रागवायची वेळ येणार नाही..

 

अशाप्रकारे ही रागावर नियंत्रण करण्याची सुंदर अशी कथा आहे. ज्याप्रमाणे त्या व्यक्तीने रागावर नियंत्रण करून आपले पुढच्या आयुष्य सुंदर केले. त्याप्रमाणे तुम्ही देखील रागाववर नियंत्रण करून आपले येणारे आयुष्य सुंदर करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published.