जेवणा अगोदर आल्या सोबत ही एक वस्तू खा, वारंवार पाद येणे, कायमचे बंद. तोंडाला चव न येणे, करपट ढेकर येणे कायमचे बंद ; सकाळी पोट दोन मिनिटात धुतल्यासारखे साफ होणार ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो अनीयमित जेवण, अवेळी जेवण, अवेळी झोप, अपुरी झोप अशा विविध करणारे तसेच तेलकट-तुपकट तळलेले पदार्थ अतिप्रमाणात खाणे या कारणामुळे अपचन गॅस, एसिडिटी, भूक न लागणे, पोट सारखं गच्च वाटणे अशा समस्या होऊ लागतात. या समस्येसाठी आपण आज एक घरगुती उपाय पाहणार आहोत. ही समस्या सुरु झाली की आपली भुक हळूहळू कमी होऊ लागते पोट गच्च होणे पोट जड होणे खायची इच्छा न होणे तोंडाला चव नसणे थोडे जरी खाल्ले तरी पोट गच्च होणे, गॅसेस, अपचन, पित्त अशा विविध समस्या सुरू होतात.

मित्रांनो भूक न लागणे काहीही खाण्याची इच्छा न होणे थोडे जरी खाल्ले तरी पोट गच्च होणे जड होणे या समस्येतून मुक्त होण्यासाठी आज आपण एक घरगुती उपाय पाहणार आहोत. जो अतिशय सोपा आहे आणि याचे कोणतेही साइड इफेक्ट होणार नाहीत. चला तर पाहूया काय आहे हा उपाय. मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी खूपच साधा व सरळ उपाय घेऊन आलो आहे. हा तयार करण्याची पद्धत खूप सोपी आहे. पोटातील गॅसवर हा रामबाण उपाय आहे. तुमच्या पोटात कितीही गॅस तयार झालेला असुदे किंवा अॅसिडिटी असेल तर लवकर नाहीशी होते. ही माहिती तुम्ही पुर्णपणे वाचा.

जर तुम्ही वारंवार गॅस झाल्यावर एलोपेथी औषधे सेवन करीत असाल तर आपल्या लिव्हरला ती नुकसान करतात. त्याचबरोबर अन्य आजारांना आमंत्रण देतात. हा उपाय कसा तयार करायचा आहे हे पाहू. हा साधा उपाय करण्यासाठी तुम्हाला इथे घ्यायचे आहे आले. आल्यामध्ये मित्रांनो पाचक एंझाइन असते. जे पोटात होणार्‍या गॅस अपचन या समस्येपासून सुटका करते. पोटात गॅस बनला आहे अॅसिडिटी आहे तर आले खूपच सहजपणे गॅसची समस्या दूर करते. साधारण १ इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे. त्याची साल चाकूच्या मदतीने काढून घ्या.

नंतर त्या आल्याच्या छोट्या छोट्या चकत्या करा. नंतर तुम्हाला घ्यायचे आहे सैंधव मीठ. सैंधव मीठ आपली पचनशक्ती वाढवते. त्याचबरोबर त्याचे पोटासाठी अनेक फायदे आहेत. अशा प्रकारे सैंधव मीठ आपल्या बोटावर घ्या. ते आल्याच्या तुकड्याला लावा. मित्रांनो सैंधव मीठाला रॉक मीठ असे देखील म्हणतात. हे मीठ नैसर्गिकरित्या पूर्णपणे शुद्ध मानले जाते. यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. याव्यतिरिक्त सैंधव मीठामध्ये कमी खारटपणा आणि आयोडीनचे प्रमाण कमी असते, यामुळे उच्च रक्तदाब आणि डोळ्यांच्या सूजची समस्या नियंत्रित होते. तर आल्याच्या तुकड्याला सैंधव मीठ लावल्यानंतर तुम्हाला जेवणाच्या अगोदर हा आल्याचा तुकडा चाऊन चाऊन खायचा आहे. त्यामुळे तुमचे पोट साफ होण्यास मदत होईल.

सैंधव मीठ हलके आणि पचणासाठी अत्यंत चांगले आहे, यामुळे पचन प्रणाली सुधारते. याव्यतिरिक्त, रोगप्रतिकारक प्रणाली देखील चांगली होते आणि सैंधव मीठाचे सेवन केल्याने शरीराला उर्जा मिळते. कारण शरीराला आवश्यक पोषक आणि खनिज पदार्थ सैंधव मीठामध्ये आढळतात आणि सैंधव मीठाचा आहारात समावेश केल्याने रक्त परिसंचरण सुधारते. याव्यतिरिक्त, हे शरीरातील पीएच पातळी राखण्यासाठी देखील प्रभावी आहे. त्याच बरोबर सैंधव मीठ शरीरातील चरबी कमी करण्यास देखील फायदेशीर आहे. जर आपले वजन वाढले असेल तर आपण आहारात सैंधव मीठाचा समावेश केला पाहिजे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

मित्रांनो आल्याचे फायदे आपल्या सर्वांना माहीतच आहेत. आले हे औषधी आहे. यातील फेनोलिकमुळे अपचन तसेच जलन याला आराम मिळतो. पित्त होण्यापासून रोखले जाते. आले वेदनाशामक, तापमान कमी करणारे आहे. जिंगेरॉलपेक्षा हे कमी वासाचे व गोडसर वासाचे आहे. आल्यामुळे तोंडात लाळेची निर्मिती जास्त प्रमाणात होते. त्यामुळे घास गिळायला सोपे जाते आणि मित्रांनो बऱ्याच लोकांना पाद येण्याची समस्या सतत होत असते. सतत पाद येणे, पोटात गॅस होणे या ज्या तक्रारी आहे या तक्रारी कमी करण्याचं काम हे आलं करत असत. मित्रानो अद्रक ला महाऔषध असे म्हंटले जाते. हे आलं काय करत तर थकवा असेल, हे दूर करण्याचं काम करत.

तर मित्रांनो आल्याच्या तुकड्यावर सैंधव मीठ लावून ते जेवणाच्या अगोदर चावून चावून खायचे आहे. त्यामुळे तुमचे पोट साफ होण्यास मदत होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.