आपली चांगली वेळ येण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ आपल्याला देतात हे दहा संकेत? वेळीच व्हा सावधान? श्री स्वामी समर्थ ..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपण सर्वजण स्वामींचे भक्त आहोत. कारण आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वामी कधीही एकटे सोडत नाहीत. आपल्याला कितीही अडचणी आल्या तरी त्या अडचणी मधून स्वामी आपल्याला बाहेर काढतात. आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचे संकेत देखील देत असतात. आपल्याला वेगवेगळे मार्ग देखील सांगत असतात. आपल्याला कितीही अडचणी आल्या तर स्वामींचे एक वाक्य आपल्याला खूप काही दिलासा देऊन जातं. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’.

 

आपण कोणत्याही संकटामध्ये कधीही न घाबरतात धैर्याने प्रत्येक संकटाला सामोरे जायचे आहे. कारण आपल्या सोबत स्वामी असल्यामुळे आपल्याला कशाची भीती वाटण्याची गरज नाही. स्वामिनी सांगितले आहे की चांगली वेळ तुमच्यावर येण्याआधी हे दहा संकेत तुमच्या सोबत घडतात तर ते दहा संकेत कोणते? व ते कशाप्रकारे आपल्याला मिळत असतात? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

 

प्रत्येकाला वाटत असते की आपण श्रीमंत असले पाहिजे. आपल्याकडे सर्व सुख सोयी असल्या पाहिजे. आपल्याकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता कधीच भासली नसली पाहिजे. असं प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी ते खूप प्रयत्न देखील करत असतात. फार कष्ट करून ते स्वतःच्या हिमतीवर काही ना काही करत असतात. असं म्हणतात की महालक्ष्मी ही धनाची देवी आहे. ज्या घरात महालक्ष्मी वास करते. त्या घरामध्ये कधीही कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही.

 

त्या घरांमध्ये कोणतेही अडचण देखील येत नाही. पैशाची तर कमतरता त्या घरामध्ये कधीच भासत नाही.जीवनामध्ये नेहमी सुख शांती लाभते. महालक्ष्मी सोबत जर तुम्ही भगवान विष्णूची पूजा केली तर घरामध्ये धनसंपत्ती येते व पैशाची कमतरता कधीच भासत देखील नाही. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्यापूजे मुळे घरामध्ये कधीच पैशाची कमी भासत नाही व पैशाच्या कोणत्याही अडचणी निर्माण देखील होत नाहीत. त्याचबरोबर माणसांचा मानसन्मान देखील वाढतो.

 

आता आपण पाहूया की आपण श्रीमंत होण्याआधी कोणती दहा लक्षणे आपल्याला मिळतात. पहिला संकेत आहे ते म्हणजे जर तुमच्या घरामध्ये अचानक काळया मुख्या दिसल्या काळा मुंग्यांचं वर्तुळ जर तुमच्या घरामध्ये तयार झाल असेल आणि वर्तुळ बनवून त्या काहीतरी खात असतील तेव्हा समजून सांग की तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होणार आहे व तुमच्यावर मातालक्ष्मी प्रसन्न होणार आहे. जर काळया मुंग्याने घर केले तर त्याचे तुम्हाला शुभ संकेत मिळणार आहेत. म्हणजेच की तुमच्या बाबतीमध्ये काहीतरी चांगली बातमी घडणार आहे.

 

दुसरा संकेत आहे की जर एखाद्या पक्षी ने आपले घरटे घराच्या खिडकीवर किंवा घराच्या आजूबाजूला बनवले असेल किंवा मधमाशी देखील पोळ आपल्या घरी बनवले असेल तर ते देखील आपल्यासाठी खूप शुभ संकेत असतो.वास्तुशास्त्रामध्ये पक्षी किंवा कीटकांचे घरटे बनवण्याबाबत शुभ आणि अशुभ माहिती सांगितली आहे. जर तुमच्या घरात एखाद्याने किंवा पक्षाने घरटे बनवले असेल तर ते तुमच्यासाठी शुभ आहे. आणि आता तुमच्या घरात महालक्ष्मीच्या आगमन होणार आहे.

 

तिसरे संकेत आहे ते म्हणजे सामान्य लोकांना घरामध्ये पाल दिसली की लगेचच ते पळून जातात.खूप कमी लोकांनाही माहीत असते की घरामध्ये पाल दिसणे शुभ मानले जातात. खास करून जर तुम्हाला पाल घराच्या मंदिरामध्ये दिसली तर आणखी भाग्यवान मानले जाते. कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देणार आहेत.

 

सामान्यता पाल दिसली की लोक तिला चांगले मानत नाहीत आणि हाकलून देतात. पण अचानक पाल दिसणे खूप शुभ मानलं जातं. जर ती घराच्या मंदिरात दिसली तर ते अधिक शुभ मानला जातो. जर पाल एखाद्याचा पाठलाग करताना दिसली तर ते खूप शुभ लक्षण आहे व प्रगतीचे लक्षण आहे.तसेच तुळशीच्या रोपांमध्ये पाल दिसणं देखील खूप शुभ मानले जाते. अमाप संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे.

 

चौथा संकेत आहे म्हणजे सहसा जेव्हा आपले हात पाय खाजवतात म्हणजे हातापायाला खाज येते तेव्हा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर घरातील मोठी माणसे नेहमी सांगतात की पायाला खाज येण्यामागे काही संकेत दडलेले आहेत. याकडे फारसे लक्ष देत नाही. परंतु या विषयाबाबत सामुद्रिक शास्त्र आणि शकुनशास्त्रामध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

 

शास्त्रानुसार असं सांगितलं गेलं की हातावरील खाज तुम्हाला सांगतात की धनलाभ होणार आहे. हात खाज येण शुभ आहे. जर कोणाचा डावा हाताला वारंवार खाज येत असेल तर हे खूप शुभ लक्षण आहे. असं म्हटलं जातं आणि याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच धनाशी संबंधित काही चांगली बातमी मिळून जाणार आहे. हाताला खाज येणे हे धन लाभाचे लक्षण आहे.

 

पाचवा संकेत आहे ते म्हणजे जर तुम्हाला स्वप्नामध्ये झाडू, घुबड, बासुरी, हत्ती, मुंगूस, शंख, नाग, गुलाब, तारे दिसले तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे. आणि लवकरच तुम्हाला खूप मोठा धनलाभ देखील होणार आहे. सहावा संकेत आहे तो म्हणजे असं म्हटलं जातं की सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी शंख चा आवाज ऐकल्यानंतर महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे.

 

सातवा संकेत असा आहे की जर घराच्या बाहेर गेल्यास तुम्हाला ऊस दिसला तर हे देखील पैसे मिळण्याचे लक्षण आहे. आठवा संकेत आहे तो म्हणजे घुबडे. लक्ष्मीची वाहन मानले जाते. घुबडा बाबत आपल्याला समाजात अनेक प्रकारच्या समजूती प्रचलित आहेत. शकुन शास्त्रानुसार घुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ आणि अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते. जसे की तुम्ही प्रवासाला जात असेल आणि वाटते तुम्हाला घुबड दिसलं तर धन मिळण्याची संकेत आहे.तर घुबड घरी आले तर ते अशुभ मानले जाते. त्यामुळे घराची प्रगती थांबू शकते.

 

नववा संकेत आहे तो म्हणजे जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जाणार आहेत आणि वाटेत कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला खूप पैसे मिळणार आहेत. माता लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे. दहवा संकेत आहे तो म्हणजे सकाळी सकाळी बाहेर पडल्यावर कोणीतरी झाडू मारताना दिसल्यास हा देखील एक शुभ संकेत मानला जातो आणि असे दृश्य तुम्हाला दिसत असेल तर समजून जा तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे.

 

अशाप्रकारे हे काही संकेत आहेत जे तुम्हाला तुमचे चांगली वेळ येण्यापूर्वी म्हणजेच तुम्हाला धनलाभ होण्यापूर्वी मिळत असतात. असे स्वामी महाराजांनी सांगितलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.