श्री स्वामी समर्थांच्या आवडणाऱ्या या पाच गोष्टी जो भक्त पाळतो, या गोष्टी त्यांच्यावर लवकर होते स्वामी कृपा …..!!

राशि भविष्य

मित्रांनो स्वामींचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपण नेहमी मनोभावे स्वामींची सेवा करत असतो पण काही जण मनात वेगळे विचार ठेवून स्वामींची सेवा करत असतात म्हणजेच स्वामींची सेवा करत असताना आपले ध्यान इतरत्र असणे आपण स्वामी सेवा करतो हे इतरांना दाखवणे या अशा चुकीच्या सवयींमुळे स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही.

स्वामींना आवडणाऱ्या काही गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत ज्या गोष्टी आपण केल्या पाहिजे जेणेकरून स्वामींची कृपा आपल्यावर झाली पाहिजे. अशा काही गोष्टी असतात त्या चुकूनही कधी करू नका त्यामुळे स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर राहणार नाही अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या करणे योग्य नाही आपण केलेली स्वामींची कृपा याचा प्रचार करत राहू नये स्वामीं बद्दल चुकीची माहिती कुणाला सांगू नये.

आपल्यापासून स्वामींना हवे असते ते म्हणजे फक्त मनापासून केलेली श्रद्धा मनापासून केलेली आराधना या गोष्टी स्वामींना हव्या असतात. कुठलाही श्रध्दाचा त्यांना देखावा आवडत नाही पण स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांच्या काही आवडत्या गोष्टी केल्या पाहिजे. त्या गोष्टी कोणत्या आहेत व त्या कशा प्रकारे करायच ते जाणून घेऊयात आशा ह्या पाच गोष्टी त्या आपण जाणून घेणार आहोत.

पहिली गोष्ट आहे ती म्हणजे सगुण उपासना. या उपासनेमध्ये कोणतीही मनात इच्छा न ठेवता स्वामींची आराधना करणे श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करणे किती वेळा केला तरी चालेल एक माळ, दोन माळ किंवा अकरा माळी केला तरी चालेल. ही उपासना करताना कोणतीही अपेक्षा मनात ठेवू नये मनोभावाने ही सेवा करा व या सेवेमध्ये खंड पडू देऊ नका. रोज नित्यनेमाने सेवा करत जा.

दुसरी उपासना म्हणजे अन्नदान. अन्नदान हे एक श्रेष्ठ दान आहे गरजू जे लोक आहे त्यांना अवश्य अन्नदान करावे बऱ्याच लोकांना रोज शक्य नसते. परंतु महिन्यातून एकदा तरी अन्नदान करावे किंवा वर्षातून एकदा केले तरी अन्नदान हे करावे.पण अन्नदान हे अवश्य करावे. अन्नदान हे श्रेष्ठदान आहे. जर का अन्नदान आपल्याकडून होत नसेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला काहीतरी मदत अवश्य करणे.

ती कोणत्याही स्वरूपाची असली तरी चालेल तिसरी गोष्ट म्हणजे दत्त महाराजांचे नामस्मरण. तुम्हाला माहिती आहे का दत्त महाराजांचे रूप म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत. त्यामुळे दत्त महाराजांचे नामस्मरण करत जावे. फक्त दत्त महाराजांचे नव्हे तर स्वामींचे केले तरीही चालेल. स्वामींची एकच इच्छा असते की नामस्मरण करत जावे नामस्मरण सोडून देऊ नये.

नंतरची गोष्ट माणूस जोडण्याची आवड. ज्या व्यक्ती स्वामींच्या मठात जातात केंद्रात जातात त्यांना माहिती असतं माणसं कशी जोडायची त्यांना माहिती असते. स्वामींची सेवा केल्याने कितीतरी चांगल्या गोष्टी आयुष्यात येऊन आयुष्य पलटून जातात. हे सगळं मनोबल त्या व्यक्तीत आलेले असते आणि असे लोक माणसे जोडतात. सगळ्यात शेवटचे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहे

त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहा. जे काय देवाने दिले आहे त्या गोष्टींमध्ये समाधानी राहण्याची सवय करून घ्या. विनाकारण दुसऱ्यांना मिळणार या गोष्टी वरती मनात कडू पण आणू नये किंवा देवाने आपल्याला काहीच दिले नाही असे सतत बोलत बसू नये. आपले कर्म व भोग हे आपल्याला भोगावेच लागतात. स्वामी सर्वांचे चांगले करतात. अशक्य असे स्वामींकडे काहीच नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.