गुडघेदुःखी, कंबरदुःखी, सांधेदुःखी, आखडलेल्या नसा, या सर्वांवर १००% रामबाण उपाय, जो चालू शकत नाही तो पण पळू लागेल ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. दिवसेदिवस अनेक प्रकारचे विकार डोके वर काढू लागले आहेत. मित्रानो अनेकांना चालनेदेखील शक्य नसते तसेच कंबरदुखी, गुडघेदुखी याच्या वेदना सहन होत नाहीत. आज आपण जो आज काढा बनवणार आहोत याच्या सेवनाने अगदी चालूही शकत नाही तो पळू लागेल. कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी आखडलेल्या नसा यावर 100% रामबाण उपाय आहे. जो चालूही शकत नाही पळू लागेल. कंबरदुखी गुडघेदुखी सांधेदुखी यांने त्रस्त आहेत अगदी दोन-तीन दिवसांमध्ये त्यांना नक्कीच आराम मिळणार आहे.

मित्रांनो सांधेदुखीचा आजार आहे तो कसा होतो ? तर शरीरामध्ये वात रोग निर्माण होतो आणि हा वात रोग आपल्या सांध्यांमध्ये पोहोचतो. सांध्यांमध्ये पोहचला कि, सांध्यामधलं वंगण कमी होत. वंगण कमी झाल्यामुळे हाडे एकमेकांवर आदळतात घासतात आणि त्यामुळे वेदना होतात. त्या मात्र अत्यंत वेदनादायी असतात आणि मरण यातना म्हटलं तरी चालेल. आपण जे औषध तयार करायचे आणि हे सकाळी उपाशीपोटी घ्यायचा आहे.मित्रांनो हे औषध कसे तयार केलेल आहे किंवा घ्यायचं कोणी, घ्यायचं नाही कोणी? कोणता पदार्थ टाकायचं नाही याची सविस्तर माहिती पाहुयात.

मित्रांनो या उपायासाठी आपल्याला पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे सुंठ. सुंठ म्हणजे सुकवलेले आले. आल्याला दुधामध्ये भिजवून उन्हामध्ये सुकवले की सुंठ तयार होते. सुंठ किंवा सुंठीची पूड हा एक गुणकारी औषधी पदार्थ आहे. खूप सर्दी झाली असल्यास, नाक चोंदले असेल वा गळत असल्यास सहाणेवर सुंठ उगाळून त्याचा लेप किंचित कोमट करून नाकावर व कपाळावर घातल्यास रुग्णास थोडा आराम वाटू शकतो.

मित्रांनो काही लोक सुंठ नसल्यास आल्याचा वापर करतात. पण या उपायासाठी सुंठ म्हणजे सुंठच वापरायचा आहे. सुंठीची पावडर करून घ्यायची आहे. वात संतुलित करण्याचं काम सुंठ करत असते. वायू रोगावर गुणकारी आहे. गॅसेस, अपचन अशा समस्या दूर करण्याचे काम सुद्धा सुंठ करते. सुंठ एक मसाल्याचा पदार्थ आहे आणि अत्यंत गुणकारी रामबाण असा हा पदार्थ आहे. या उपायासाठी सुंठीची अर्धा चमचा पावडर लागणार आहे.

तर दुसरा पदार्थ लागणार आहे ओवा. हिंदीमध्ये अजवाइन म्हणतात. आतडी साफ करण्याचे काम ओवा करत. पचनसंस्था व्यवस्थित करणे, पोटाचे विकार गायब करण्याचे काम करत असतात आणि वात रोग नियंत्रित करण्याचे काम सुद्धा ओवा करतो. शरीरांमध्ये फॅट म्हणजे चरबी जमा झालेली असेल तर ते विरघळायचं काम सुद्धा ओवा करत. म्हणून आपल्या आहारामध्ये किंवा पण जेवण झाल्या नंतर कधीतरी ओवा खायला पाहिजे.

मित्रांनो तिसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे तेजपत्ता म्हणजेच तमालपत्री. मसाल्याचा अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आहे. डायबिटीस किंवा शुगर असणाऱ्या लोकांनी तेज पत्त्याचे सेवन केले पाहिजे. बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्याचे काम तेजपत्ता करतो. तसेच पोट साफ करणं. वायू रोगांपासून आपलं संरक्षण करणं. आणि जर वात रोगापासून संरक्षण होते आणि त्यामुळे गुडघेदुखी, सांधेदुखी, मणक्याचे आजार, कंबरदुखी, आखडलेल्या नसा यावर संपूर्णपणे आपण नक्कीच या आजारांपासून दूर राहू शकतो.

मित्रांनो आपण तीन पदार्थ घ्यायचे आहेत. अर्धा चमचा सुंठ पावडर, एक चमचा ओवा आणि दोन ते तीन तेजपत्ता. एका भांड्यात दोन कप पाणी घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर टाकायची त्यानंतर आपण एक चमचा ओवा आणि दोन तेजपत्ता टाकणार आहोत.

हे पाणी इतके उकळून घ्या की, दोन कपाचे एक कप पाणी शिल्लक राहीले पाहिजे. हा चहा गाळून घ्यायचा. त्याच्यामध्ये तुम्ही गुळ घालू शकता. डायबिटीजचा प्रॉब्लेम आहे त्यांनी मात्र गुळाचा वापर करूनये. हा काढा सकाळी अनुशापोटी- उपाशीपोटी आपल्याला कोमट घ्यायचा आहे. घोट घोट करून हा काढा आपल्याला सावकाश प्यायचा आहे. हा उपाय सलग तीन ते चार दिवस करा.

सकाळी उपाशीपोटी करा. प्यायला जमणार नाही त्यांनी सायंकाळी प्यायला तरी चालेल. त्यानंतर अर्ध्या तासानंतर तुम्ही नाश्ता वगैरे तुम्ही करू शकता. तर हा उपाय रामबाण आहे जो अगदी म्हाताऱ्या माणसांना त्रास होतो तो दूरहोईल. परंतु अगदी कमी वयामध्ये सुद्धा अनेकांना कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी आदी समस्या आढळतात, नसा आखडलेल्या असतात. या उपायामुळे या सर्व समस्या दूर होतील. सांधेदुखी, संधीवातापासून तुमचं संरक्षण होईल. म्हणून हा साधा उपाय तुम्ही नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.