मित्र मैत्रिणींनो जास्त भात खाण्याने शरीराला होते हे नुकसान भात खाण्याचे नुकसान ; जास्त भात खाणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा ……!!

आरोग्य टिप्स

भात खाणे तसे सर्वांनाच पसंत असते आणि सर्व लोक तो खूपच आवडीने खातात. परंतु तुम्हाला माहीत आहे का, हाच तांदूळ तुमच्या शरीराला नुकसान पोहोचवू शकतो. ज्याबद्दल तुम्ही कधी विचारच केला नसेल. नेहमीच लोक भाताचे सेवन हे छान स्वादिष्ट अशा पक्वानांच्या बरोबर करतात.त्याचप्रमाणे जेवणाच्या ताटात जर भात नसेल, तर जेवण अपूर्ण वाटते. पण जर जेवणात भात असेल, तर मात्र असे वाटते, की छान आता पोट नक्की भरणार. तुम्हाला कदाचित माहीत असेल की तांदूळ दोन प्रकारचे असतात. एक पांढरा आणि दूसरा पिवळ्या रंगाचा असतो, ज्याला ब्राऊन राइस असे म्हणतात.

मित्रांनो पांढरा तांदूळ शरीरास नुकसानकारक असतो. पांढर्‍या तांदुळावरचे टरफल काढून टाकले जाते. ज्याला साधारण भाषेत पॉलिश तांदूळ म्हणतात. त्याच्या उलट, पिवळ्या तांदुळावरील टरफल काढले जात नाही. कारण याला प्रथम हलके शिजवले जाते, ज्यामुळे त्याचे टरफल कडक होते. आणि पॉलिश केलेला भात लवकर शिजतो, लवकर तसा पचतोही परंतु लवकर पोट भरले तरी रिकामेही लवकरच होते. तसेच त्यामुळे आपली पचनशक्ती कमजोर बनते. त्यामुळे पचनसंस्थेवर असा परिणाम होतो की तिला कमी वेळात पटापट अन्न पचवण्याची सवय लागते जी शरीराला अतिशय घातक असते.

तसेच त्यामुळे जर भात सोडून इतर पचनास जड पदार्थ खाल्लात तर त्याचे पचन होत नाही याउलट पोटाचे विकार वाढतात. सफेद तांदुळात विटामीन सी ची मात्रा अजिबात नसते. ज्यामुळे हाडे कमजोर होऊ शकतात. मधुमेह झालेल्या लोकांसाठी भात नुकसान करणारा आहे.त्यामुळे अशा लोकांनी भाताचे सेवन करू नये. अस्थमा झालेल्या लोकांनी भात खाऊ नये. भातात ग्लुकोजची मात्रा खूप असते. त्यामुळे मधुमेही लोकांनी याचे सेवन करू नये. अस्थमाच्या लोकांना पण भात न खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ शकतो.म्हणून असा रुग्णांनी भातापासून दूर राहावे. तुमच्या पोटात अल्सर ची समस्या असेल तर शिळा भात उपयुक्त ठरतो.

आणि त्यासाठी आठवड्यातून तीन वेळा शिळा भात खाणे गरजेचे आहे. यामुळे लवकर आराम मिळतो. पांढऱ्या भाताला पर्यायही आहे. तो म्हणजे ब्राऊन भात. तो जास्त आरोग्यदायी असतो.ब्राऊन भातामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. ब्राऊन भातामुळे त्वचा मुलायम राहते. तांदळाची पेजही शरीरासाठी चांगली असते. भात मुळीच खाऊ नका असे नाही, त्याचे प्रमाण कमी करा, जर जास्त खात असाल तर तितका भरपूर व्यायाम करा. तसेच जेवणामध्ये सर्वप्रथम ज्वारी चा समावेश करा, कोणताही आजार होणार नाही.त्यानंतर गहू, मक्का यांचा समावेश करा, नाचणीचाही समावेश करा. शेवटी भाताचा पर्याय ठेवा आणि रोजच्या जेवणात पांढऱ्या भाताचं प्रमाण कमी करून ब्राऊन भात खा. म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.