घराच्या मंदिरामध्ये असतील या 4 वस्तू तरच आजच बाहेर काढा नाहीतर संपूर्ण घर होईल बरबाद …..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्याच घरांमध्ये देवघर हे असते. अनेक देवी देवतांच्या मूर्ती, फोटो आपल्या देवघरांमध्ये असतात. घरातील महिला किंवा इतर सदस्य आपल्या घरातील देवघरांमध्ये दररोजची देवपूजा नित्यनेमाने अगदी मनोभावे व श्रद्धेने करीत असतात. कारण देवी देवतांचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर तसेच कुटुंबीयांना प्राप्त व्हावा. तसेच आपल्या कुटुंबीयातील प्रत्येक सदस्यांना कामांमध्ये यश यावे, घरामध्ये आनंददायी वातावरण असावे, सुख शांती समाधान आपल्या घरामध्ये राहावे यासाठी आपण घरातील देवपूजा ही करीत असतो.

तर मित्रांनो देवघरांमध्ये आपण अशा बऱ्याच काही वस्तू ठेवत असतो त्या आपणाला उपयोगाच्या असतात. परंतु मित्रांनो देवघरांमध्ये अशा काही वस्तू देखील आपण ठेवत असतो त्याचा नकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर देखील होत असतो. परंतु या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत हे आपल्याला माहिती नसते. त्यामुळे अशा वस्तू आपण देवघरांमध्ये साठवून ठेवत असतो.

परंतु मित्रांनो अशा काही वस्तू असतात ज्या आपल्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण करत असतात म्हणजेच आपल्या घरामध्ये द्वेश, कलह, वाद-विवाद होत असतात. तसेच आर्थिक चणचण आपणाला भासत असते. तर मित्रांनो आज मी तुम्हाला अशाच काही वस्तूंबद्दल सांगणार आहे जे आपल्या देवघरांमध्ये कोणत्या वस्तू असाव्यात आणि कोणत्या वस्तू नसाव्यात याविषयी.

चला तर मग जाणून घेऊया त्या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत ते. तर मित्रांनो पहिली वस्तू म्हणजे आपल्या देवघरांमध्ये असणारा दिवा. तर मित्रांनो आपल्या देवघरांमध्ये मातीचा दिवा अवश्य असावा. जर मातीचा दिवा शक्य नसेल तर तुम्ही धातूचा दिवा देखील वापरू शकता. यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदते.

तसेच मित्रांनो आपल्या देवघरांमध्ये स्वस्तिक असणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही तुमच्या देवघरांमध्ये कुंकूने जरी स्वस्तिक काढले तरीही चालते. या स्वस्तिकमुळे आपल्या सौभाग्यात तसेच आपल्या घरातील सुख शांतीमध्ये वाढ होते. आपले घर हे समाधानाचे कायम राहते.

यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे मित्रांनो कलश. कलश हा सुख-समृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे मित्रांनो कलशावर स्वस्तिक काढून तुम्ही हा कलश आपल्या देवघरांमध्ये ठेवायचा आहे. त्यामुळे आपल्या घरातील सुख समृद्धी मध्ये नक्कीच वाढ होते. यानंतरची वस्तू म्हणजे एक घंटा. मित्रांना आपल्या देवघरांमध्ये घंटी अवश्य असावी.

म्हणजेच घंटीच्या आवाजाने ज्या काही आपल्या घरातील नकारात्मक शक्ती असतील त्या बाहेर जातील. त्यामुळे मित्रांनो जेव्हा तुम्ही देवपूजा करता देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला घंटीचा आवाज आपल्या घरामध्ये करायचा आहे. त्यामुळे ज्या काही नकारात्मक अशुभ गोष्टी आहेत त्या घरातून निघून जातील.

तर मित्रांनो या होत्या काही वस्तू ज्या आपल्या देवघरांमध्ये असणे शुभ असतात. म्हणजेच या वस्तू आपल्याला देवघरांमध्ये अवश्य ठेवायचे आहेत. तर मित्रांनो आता जाणून घेऊया की देवघरांमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी आपणाला ठेवायचे नाहीत. जेणेकरून त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो.

तर मित्रांनो आपल्या देवघरांमध्ये गणपतीची मूर्ती ही विषम संख्यामध्ये अजिबात ठेवायची नाही. म्हणजेच एक, तीन पाच, अकरा अशा संख्येमध्ये आपल्याला गणपतीची मूर्ती अजिबात देवघरात ठेवायची नाही. दोन मूर्ती देवघरात असाव्यात.

तसेच मित्रांनो, आपणाला आपल्या देवघरांमध्ये तुटलेले तुकडा तांदूळ अजिबात ठेवायचे नाही किंवा खूप दिवसांपासून जुने असलेले तांदूळ आपण आपल्या देवघरामध्ये अजिबात ठेवायचे नाही. म्हणजेच जुने अर्पण केलेले तांदूळ आपण जास्त काळ आपण आपल्या देवघरांमध्ये ठेवायचे नाहीत. यामुळे मित्रांनो आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती निर्माण होते.

तसेच मित्रांनो आपल्या देवघरात किंवा देवघराजवळ आपण आपल्या पूर्वजांचे फोटो ठेवले असतील तर ते लगेच आपल्याला काढायचे आहे. कारण वास्तुशास्त्रानुसार मृत व्यक्तींचे फोटो हे आपल्या देवघरात किंवा देवघराच्या बाजूला ठेवणे खूपच अशुभ मानले गेलेले आहे.

तसेच आपल्यापैकी बरेच जण अनेक साधुसंतांच्या मुर्त्या, फोटोज देखील आपल्या देवघरांमध्ये ठेवतात. परंतु हे खूपच अशुभ मानले गेलेले आहे. त्यामुळे मित्रांनो अशा साधू संतांच्या फोटो किंवा मूर्ती आपण आपल्या देवघरात अजिबात ठेवायच्या नाहीत. तसेच मित्रांनो आपल्या पूजा घरांमध्ये काळभैरव, शनिदेवतेची तसेच काली मातेची मूर्ती अजिबात ठेवायची नाही.

तसेच मित्रांनो श्री लक्ष्मी मातेची उभ्या मूर्तीचे पूजन देखील आपल्याला पूजा घरामध्ये करायचे नाही. मित्रांनो लक्ष्मीची मूर्ती ही बसलेल्या स्वरूपात असावी आणि याचे पूजन आपल्याला करायचे आहे. तर मित्रांनो अशा होत्या या काही गोष्टी, वस्तू ज्या आपल्याला देवघरांमध्ये ठेवायच्या नाहीत. ज्यामुळे त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो.

जर तुमच्याही घरांमध्ये अशा वस्तू असतील देवघरांमध्ये अशा वस्तू असतील तर तुम्ही त्या नक्कीच बाहेर काढा. देवघरांमध्ये अशाच वस्तू ठेवा ज्याचा सकारात्मक परिणाम होईल. घरामध्ये सुख समाधान ऐश्वर्या प्राप्त होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.