लग्नानंतरही पुरूष का होतात दुस-या महिलांकडे आकर्षित… हे आले धक्कादायक कारण समोर ..!!

Uncategorized

मित्रांनो, कोणाकडे आकर्षित होणे वा एखाद्या व्यक्तीची स्तुती करणे यात चुकीचे तोवर नाही जोवर तुम्ही आपली मर्यादा जाणून आहात आणि आपल्या नात्याचा आदर करता आहात. पण अनेकदा मर्यादा ओलांडल्या जाऊ शकतात आणि वैवाहिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त होते. पण कधी विचार केला आहे की यामागचे कारण काय आहे? विवाहित पुरुषांना इतर पुरुषांच्या बायका त्यांच्या स्वतःच्या पत्नींपेक्षा अधिक आकर्षक का वाटतात? म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण काही आश्चर्यचकित करणारी पण तितकीच साधीशी कारणे जाणून घेणार आहोत.

 

त्यातील पहिले कारण म्हणजे पत्नीसोबत प्रत्येक गोष्टीत भांडण होणे. “तुझं लाईफ सही आहे यार, तुझी बायको किती साधी आहे…!” असं जेव्हा एखादा पुरुष म्हणू लागतो तेव्हा समजावं की त्याला त्याच्या वैवाहिक आयुष्यात स्वातंत्र्य मिळत नाही आहे. प्रत्येक पुरुषाला असे वाटते की त्याने नेहमी आपल्या मनाप्रमाणे जगावे. त्याला कोणालाच उत्तर देण्याची गरज नाही. पण जेव्हा लग्न होते तेव्हा पुरुषांचे सर्व सुख आणि शांती संपुष्टात येते. आणि मग त्यांना अशा लोकांच्या बायका आवडू लागतात, ज्या त्यांच्या पतीला सर्व स्वातंत्र्य देतात आणि पतीचे लाईफ कंट्रोल करत नाही.

 

दुसरे कारण म्हणजे मनातील एक इच्छा. प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपल्या जोडीदाराची एक प्रतिमा असते आणि त्याची इच्छा असते की त्याला तशीच जोडीदार मिळावी, परंतु वास्तविक जीवनात तीच व्यक्ती मिळणे आवश्यक नसते. अशा परिस्थितीत माणूस जे मिळेल त्यात समाधान मानायला शिकतो. पण जेव्हा तो ते गुण इतर कोणामध्ये पाहतो तेव्हा तो स्वतःला त्यांचे कौतुक करण्यापासून रोखू शकत नाही. त्यामुळे जर तुमचा नवरा दुसऱ्या एखाद्या स्त्रीचे खूप कौतुक करत असेल, तर समजून जा की त्याला नेहमीच अशी मुलगी जोडीदार म्हणून हवी होती.

 

तिसरे कारण म्हणजे कमी वयात लग्न होणे. कुटुंबाचा आणि समाजाचा दबाव यामुळे काही लोकांचे लग्न अगदी लहान वयात होते. अशी माणसे आयुष्यात हळू हळू पुढे जातात तेव्हा त्यांना जाणवते की आपण आयुष्यात खूप काही गमावले आहे. त्यांना वाटू लागते की त्यांना अजून चांगला जोडीदार मिळू शकला असता आणि ज्या जोडीदार सोबत लग्न झाले आहे तो आपल्याला सुसंगत नाही आणि हे देखील एक कारण आहे की असे लोक सहसा इतर स्त्रियांकडे खूप लवकर आकर्षित होतात.

 

चौथे कारण म्हणजे शारीरिक सुख न मिळणे. नातं सुरळीत चालण्यासाठी शारीरिक जवळीक खूप महत्त्वाची असते असं ज्याने कुणी म्हटलंय ते योग्यच म्हटलंय. अनेक नात्यात पत्नी आपल्या पतीला खुश ठेवू शकत नसते. व त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याला हवे ते सुख देऊ शकत नसते. अशावेळी पती नात्यात असमाधानी असतो आणि मग तो सहज इतर स्त्रियांकडे आकर्षित होऊ लागतो.

 

पाचवे कारण म्हणजे मुलांच्या जन्मानंतर. मूल झाल्यानंतर स्त्रीचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते यात शंका नाही. तिचे आयुष्य केवळ बाळाभोवतीच फिरत नाही, तर तिचे प्राधान्यक्रमही बदलतात. अशा स्थितीत पुरुषांना हवे ते सुख मिळत नाही आणि पत्नीची हवी असलेली साथ देखिल कमी पडते. एकंदर मुलं झाली की पतींचा आपल्या पत्नींबद्दल भ्रमनिरास होतो, त्यामुळे त्यांचे मन इकडे तिकडे भटकायला लागते.

 

सहावे कारण म्हणजे पत्नीचे चारित्र्य योग्य नसते तेव्हा. दरवेळी केवळ पती स्वतःच्या मनानेच इतर स्त्रियांकडे पाहतो असे नाही. कधी कधी स्थितीच अशी उद्भवते की त्याला ते करावे लागते. जेव्हा पत्नीचे चारित्र्य ठीक नसते, वा तिचेच अफेअर सुरु असते आणि हे जेव्हा पतीला कळते व त्याच्या लक्षात येते की त्याच्यात तिचा काही रस नाही. तेव्हा अशावेळी पती त्याची बाजू समजून घेईल आणि मानसिक आधार देईल अशी स्त्री जोडीदार शोधू लागतो. बहुतेक वेळा तो दुसऱ्या विवाहित स्त्रीकडेच आकर्षित होतो.

 

अशाप्रकारे ही काही कारणे आहेत ज्यामुळे पुरुष इतर स्त्रियांकडे आकर्षित होतात.

Leave a Reply

Your email address will not be published.