कुणीही कितीही मागु द्या ‘या’ चार वस्तू : कोणालाही देऊ नका, माता लक्ष्मी साथ सोडून जाईल, घरामध्ये येईल गरीबी…!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, काही वस्तू अशा असतात की, ज्या वस्तूंवर आपले भाग्य जोडलेले असते. अशा वस्तू आपण कोणालाही देऊ नये. कारण अशा वस्तू जर आपण इतरांना दिल्या तर, आपला घरात दरिद्रता येऊ शकते. घरातून लक्ष्मी जाऊ शकते. ही वस्तू आपण आपल्या जवळच्या मित्राला तसेच कोणत्याही जवळच्या व्यक्तीला अजिबात देऊ नये या वस्तू कोणत्या? याविषयी आजच्या या लेखांमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत.

 

पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे जोडवी. महिलांनी आपली जोडवी कोणालाही घेऊ नये. म्हणजेच ती कोणासोबत शेअर करू नये. असं केल्याने आपल्या पती पत्नी मधील प्रेम हे कमी होत असत. त्यामुळे त्या दोघांमध्ये सतत वादविवाद भांडणे होऊ लागतात आणि ज्या ठिकाणी भांडणे वादविवाद व आशांतता असते तिथे लक्ष्मी कधीही टिकून राहत नाही. ती त्या घरातून निघून जाते. त्या घरामध्ये दरिद्रता निर्माण होते.

 

दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये असलेली लहान बाळाचे कपडे. आपल्या घरामध्ये एखादी लहान बाळ असेल तर, त्या बाळाला आपण त्याची येत नसलेली कपडे इतरांना देत असतो. असे अजिबात करू नये. आपले बाळ जोपर्यंत नऊ किंवा अकरा वर्षाचे होत नाही तोपर्यंत चे कपडे इतरांना दान म्हणून कधीही देऊ नये. कारण असे केल्यामुळे त्याचा थेट परिणाम आपल्या मुलच्या भाग्यवर होत असतो.

 

जर लहान मुलांचे कपडे आपण इतरांना दिली तर, ते दुसऱ्या दिवशी लगेच आजारी पडलेले आपल्याला दिसून येते. सतत किरकिर, चिडचिड करू लागेल. नऊ वर्षाच्या किंवा अकरा वर्षाच्या पुढील मुलांचे जर आपण कपडे दान करत असु तर ती कपडे अत्यंत स्वच्छ धुवून व घडी घालून द्यावे. फाटलेले व चुरगाळलेले कपडे अजिबात देऊ नये. कारण यामुळे आपल्या जीवनामध्ये घसरण निर्माण होईल.

 

पुढील वस्तू म्हणजे आपण चपला कोणालाही दान म्हणून देऊ नये. तसेच गिफ्ट म्हणून देखील देऊ नये. पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे झाडू. आपल्या घरातील झाडू आपण इतरांना थोड्या वेळासाठी देखील देऊ नये. कारण झाडूमध्ये माता लक्ष्मीचा प्रत्यक्ष वास असतो. आपण हा झाडू देवी लक्ष्मीच्या स्वरूप मधून त्याचे पूजन करत असतो. जर आपण थोडा वेळासाठी झाडू हा इतरांना दिला तर, असे होईल की आपली लक्ष्मी आपण इतरांसोबत वाटून घेत आहोत. याचा परिणाम आपल्याला नक्कीच दिसून येते.

 

जर आपल्याला झाडू दान करायचा असेल तर, तो एखादा मंदिर मध्ये करावा आणि हे दान गुप्त असावे. म्हणजेच सकाळी पहाटे लवकर एखादा मंदिरामध्ये जाऊन या झाडूचे दान करू शकतो. झाडू दान करत असतात तो नवीन असावा ही गोष्ट नक्की लक्षात घ्यावी. पुढील गोष्ट आहे ती म्हणजे पैसे. पैसे हे कोणालाही मंगळवारच्या दिवशी उदार देऊ नका.

 

याबद्दल ज्योतिष शास्त्र मध्ये उल्लेख केलेला आहे की, मंगळवारच्या दिवशी कधीही पैसे उधार देऊ नये. कारण जेव्हा आपण मंगळवारच्या दिवशी हे पैसे दिले तर ते परत येण्याचे चान्सेस खूप कमी असतात. त्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात.

 

अशाप्रकारे या काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपण इतरांना चुकूनही देऊ नयेत. यामुळे आपल्या घरामध्ये दरिद्रता निर्माण होऊ शकते. घरात लक्ष्मीची कृपा होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.