१०० वर्ष धान्याला अजिबात कीड लागणार नाही? बिना विषारी औशधाशिवाय धान्याचा १ दाणासुध्दा खराब होणार नाही !.. नैसर्गिक पावरफुल उपाय…..!!

Uncategorized

मित्रांनो, 100 वर्ष धान्याला कीड लागणार नाही, त्यासोबतच धान्य खराब होणार नाही, तेही कोणत्याही केमिकलचा, कोणत्याही औषधाचा, पावडरचा उपयोग न करता. अगदी घरातीलच काही वस्तूंचा उपयोग करून इथे आज आपण असे काही उपाय बघ‌णार आहोत. ज्यामुळे तुम्ही 100 वर्ष देखील धान्य तुमचे टिकवून ठेवू शकता. जो उपाय तुम्हाला सोपा वाटेल त्या उपायानुसार तुम्ही तुमचे सर्व डाळी किंवा धान्य, कडधान्य सर्व साठवून ठेवा.

 

म्हणजे पैस ही वाचतील, तसेच सारखं सारखं आपल्याला याला साफ करायचीही गरज पडणार नाही. आणि हे आपले उपाय असे आहेत की यामध्ये आपला एकही रुपया खर्च होत नाही, अगदी घरातीलच वस्तूंचा आपण उपयोग करणार आहोत आणि सर्व धान्य व्यवस्थित टिकवून ठेवणार आहोत. जास्त करून तर घरामधील धान्य किंवा कडधान्य डाळी खराब होण्याच कारण असं असतं की आपल्या घरामध्ये ऊन येत नाही.

 

कुबट दमट असं वातावरण असत, एक ओलसरपणा असतो. जास्त करून तर फ्लॅट मध्ये हा प्रॉब्लेम येतो. असं ऊन न आल्यामुळे डाळी किंवा धान्य खराब होतात. आता स्पेशली घरामधे ऊन आणणं तर शक्य नाही. उन्हामध्ये आपण बरीच धान्य किंवा डाळी वाळवतो, पण तरीही ते खराब होतात. पण ते खराब होऊ नयेत यासाठी काय करायचं? यासाठी आजच्या लेखन मध्ये आपण काही घरगुती व नैसर्गिक उपाय जाणून घेणार आहोत.

 

सर्वात रामबाण उपाय आणि सर्वांनाच माहित असणारा खूपच जुना उपाय म्हणजे कडूलिंबाची पान. हा आपला पाचवा उपाय आहे. कडुलिंबाची पाने वापरण्याची पद्धत खूप वर्षापूर्वीची आहे. कडुलिंबाची पान कधीही स्वच्छ धुऊन वाळवून त्यानंतर अशाप्रकारे टाकायची म्हणजे काय यामध्ये असणारी धूळ आपल्या धान्याला लागत नाही आणि कडूलिंबाची पान टाकण्याच्या दोन तीन पद्धती आहेत. एक तर तुम्ही टिशू पेपर किंवा एखादी पॉलिथीन घ्या, कॅरी बॅग घ्या, त्यामध्ये गुंडाळून आपल्याला कडुलिंबाची पान टाकायची आहेत. तुमच्याकडे जर टिशू पेपर नसेल तुम्ही साधा पेपर वापरत असाल, तर त्या पेपर वरती तुम्हाला सुईने दोन चार छिद्र करावे लागतील, सात आठ छिद्र करून घ्या, म्हणजे त्यामधून याचा सुगंध येत राहील.

 

दुसरा उपाय म्हणजे लसूण, माचीस आणि चुन्याची खडे या तिन्ही वस्तू आपल्याला द्यायचे आहेत आणि ज्यावेळी आपण वर्षाचे धान्य साठवत असतो त्या धान्याचा साठवणुकीचा डबांमध्ये व्यवस्थित पद्धतीने थराथरावर या तीन वस्तू आपल्याला ठेवायचे आहेत. यामुळे देखील कीड लागत नाही. आणि या वस्तू ठेवल्यानंतर आपण जे धान्य साठवणुकीच्या डब्यामध्ये साठवत असतो ते डब्बे व्यवस्थित रित्या सील करून घ्यायच्या आहेत. जेणेकरून त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या हवा जाणार नाही.

 

तिसरा उपाय म्हणजे एरंडेल तेल. ज्यावेळी आपण वर्षाचे धान्य साठवणुकीसाठी ठेवत असतो त्याला एक विशिष्ट प्रमाणामध्ये एरंडेल तेल व्यवस्थित रित्या लावून ते ठेवल्याने देखील आपले धान्य खूप दिवस टिकते. चौथा उपाय म्हणजे आयुर्वेदिक दुकानांमध्ये झेंडू मुग्ध रस नावाचे एक गोळ्यांची बॉटल मिळते. ती किमान 60 ते 70 रुपयांपर्यंत आपल्याला उपलब्ध होते. या डब्बी मध्ये 31 ते 35 गोळ्या असतात. या आतील एक गोळी आपल्याला आपला धान्याच्या साठवणुकीमध्ये कापडामध्ये बांधून ठेवल्याने देखील आपल्या ध्यानाला कोणत्याही प्रकारची कीड लागत नाही.

 

अशाप्रकारे हे काही उपाय आहेत जे केल्यामुळे आपल्या धान्याला कीड लागत नाही व आपल्या धान्यातील एकही दाणा खराब होत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.