एखाद्याचा तळतळाट कसा लागतो ? एकदा वेळ काढून नक्की वाचा.. !!

Uncategorized

मित्रांनो, पाच लाखांचा खळखळाट असावा पण पाच रुपयांचा देखील तळतळाट नसावा. कोणाच्याही हाय लागून घेऊ नये. त्याची भयंकर परिणाम भोगावे लागतात. काही लोकांना पटणार नाही हा विषय तळतळाट पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतला आणि त्यांचे भोग ते भोगत असतात.

 

त्यांना नक्कीच पटेल अनेक कारणाने त्रास दिलेला असतो जसे की शारीरिक, मानसिक, आर्थिक, अपमानास्पद वागणूक. कोणाचे मन दुखावले असू शकते. कोणावर अन्याय केलेला असू शकतो. कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते. छळ केलेला असतो.कोणाची हक्काची प्रॉपर्टी फसवुण हडप केलेली असते. आणि ते करायला बळ दिलेलं असेल. शारीरिक दुखापत केलेले असेल. विश्वासातील व्यक्तीने घेतलेला गैरफायदा. ज्याने उपकार केले असतील पण आपल्या स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल.

 

त्रासाचे कुठलेही कारण असो वरील गोष्टीचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो तो खुप दुःखी होतं त्याचे मनोबल कमकुवत होत असते. पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशन मध्ये देखील जाऊ शकते.जाणून-बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो, त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देव देखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून ” तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती” निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्याला तळतळाट असं म्हणतात.

 

मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतोत्याचे हे कार्य यशस्वी होत नाही किंबहुना झाले तरी फळ जास्त वेळ टिकत नाही.सतत अपयश येते घरात आजारपण येणे अशा अनेक प्रकारांची काहीही घटना घडू शकतात आपण कितीही खरे आहोत किती खोटारडे आहोत हे फक्त आपल्याला माहीत असतं.आपल्या अंतर्मनाला आपल्याबद्दल सगळ्या गोष्टी माहीत असतात समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजे पाप लागणे त्याची परतफेड शक्यतो या जन्मात करावी म्हणजेच पाप लागते .

 

तुम्ही अस्तिक किंवा नास्तिक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब व्याजासह परत करावा लागतो मी एका पुस्तकात वाचले होते राजा दृत राष्ट्राचे शंभराचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हा त्यांनी श्रीकृष्णाला विचारले,” असं का व्हावे संबंध जीवनात मी, असे कोणतेही महापाप केलं नाही ज्याचा परिणाम स्वरूपात सर्वच्या सर्वच पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर पाहून त्याचे दुःख सोसाने माझ्या नशिबी यावे” ” तेव्हा भगवान श्रीकृष्णाने, धृतराष्ट्र राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दृष्टी दिली धृतराष्ट्र राजाने दिव्यदृष्टी द्वारे पाहिले की, साधारण 50 जन्मापूर्वी तो एक पारधी होता होता.

 

आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होते आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले. मात्र आगीची जळू लागल्याने कित्येक पक्ष आंधळे,झाले तर पक्षांची शंभरावर लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडले. धृतराष्ट्र राज्याची त्यावेळेस तिथे क्रिया त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर दुर्तराष्ट्र राज्याचे 100 पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते पूर्ण झाले.

 

कर्म हे फळ देऊनच शांत होते प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब हा होतोच हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांत आहे चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते आणि काळ मागे पुढे होऊ शकतो हा कर्माचा सिद्धांत आहे. की, “क्रिया म्हटल्यावर प्रतिक्रिया होणारच” आपण ठरवायचे आपले कर्म कसे हवे” जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ” क्षणिक सुखासाठी आपण कुणी होतं नीती भ्रष्ट”

 

अशाप्रकारे आजच्या या लेखात आपण तळतळा कशाप्रकारे लागतो याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.