अशा बायका ज्या घरात असतात तिथे भिकारी पण राजा होतो… त्या पुरुषाचे नशीब चमकते…!!

Uncategorized

मित्रांनो, असे म्हणतात कि प्रेत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो प्रेत्येक पुरुषाला वाटते कि जी स्त्री आपल्या घरी पत्नी होऊन येईल ती भाग्यशाली असते. तिच्यामुळे आपल्या घराचे स्वर्ग व्हावे आपल्या कुटुंबाची तिने चांगली काळजी घ्यावी व आपल्या कुटुंबात आनंद यावा. खूप पुरुषांच्या बाबतीत हे खरे देखील ठरते, त्यांच्या घरात येणारी स्त्री हि आनंद घेऊन येते व संपूर्ण घरात आनंदमय वातावरण पसरवते.

 

भविष्यपुराणात अश्या भाग्यशाली स्त्रियांची लक्षणे सांगितलेली आहेत. ज्या स्त्रियांमध्ये हे गुण असतात त्या ज्या घरात सून म्हणुन जातात त्या घराला स्वर्ग बनवतात. अशा बायका ज्या घरात असतात तिथे भिकारी पण राजा होतो. नशीब चमकते. ते गुण कोणते ते आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.

 

त्यातील पहिले लक्षण म्हणजे धर्ममार्गावर चालणारी स्त्री म्हणजेच धार्मिक स्त्री. जी स्त्री दररोज भगवंताचे व तुळशीचे पूजन करते. घरात देवाजवळ दिवा लावते तुळशीजवळ दिवा लावते. स्वयंपाक झाल्यावर ती देवाला नैवैद्य दाखवते नंतर सर्व जण भोजन करतात, त्या स्त्रीमुळे घरातील नाकारात्मकता निघून जाते.अश्या पवित्र वातावरणात राहणारे कुटुंब सुखी व समाधानी असते.

 

दुसरा गुण म्हणजे समाधानी वृत्ती जी स्त्री अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानते जास्त हव्यास करत नाहीत अश्या स्त्रियांवर तिचा पतीही खुश असतो. काही स्त्रिया शेजारी काही वस्तू अली कि आपल्या घरात ती येयलाच हवी असा हट्ट धरतात ह्यामुळे त्यांच्या इच्छा व मागण्या पूर्ण करता करता त्यांच्या पतीच्या नाकीनव येते.त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पतीला कधी कधी वाईट काम देखील करावे लागते आणि त्याचे परिणाम पूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात.

 

म्हणून जर स्त्री जर समाधानी असेल तिच्या गरजा जर लिमिटेड असतील तर त्या पूर्ण करताना पतीलाही जास्त कष्ट करावे लागत नाही त्यामुळे त्यांच्या घरातील वातावरण आनंदी असते.तिसरे लक्ष म्हणजे स्त्री मध्ये धैर्य असावे. कशीही परिस्थिती अली तरी ती न डगमगता त्या परस्थीतिला सामोरे जाण्याची ताकद तिच्यामध्ये असावी. वाईट प्रसंग असेल तर तिने आपल्या कुटुंबाच्या मागे अगदी धीटपणे उभे राहिला हवे, जर ती मागे ठामपणे असेल तर ती वाईट परस्थिती बदलायला वेळ लागत नाही.

 

चौथे लक्षण म्हणजे राग ना येणे, हे थोडे कठीणच आहे कारण स्त्रीचा स्वभावात राग येणे हे जन्मतः च असते. अति राग येणे, चिडचिड करणे, कर्कश आवाजात बोलणे. अशी लक्षणे स्त्री मध्ये नसावीत. थोडा फार राग सर्वच स्त्रियांमध्ये येतो आणि तो येईलाच हवा कारण नाहीतर त्या रागाचा आतल्या आत साठा होऊन कधीतरी मोठा स्फोट होत असतो.स्त्री घरात सारखा राग राग करत असेल, सारखी भांडणे करत असेल तर घरातून शांतात निघून जाते. म्हणून स्त्रीने शांत असावे, समोरच्याचे काही चुकत असेल तर नक्की बोलावे परंतु ते अगदी शांतपणे हाताळावे.

 

पाचवे लक्षण म्हणजे समजदार स्त्री, जी स्त्री समजूतदारपणे घेते. सर्व समजावून घेते जे आहे ते आहे व जे नाही ते नाही ह्याचा स्वीकार करते तसेच सर्वांशी चांगले वागते, गोड बोलते. ज्या स्त्रीचे बोलणे गोड असते ती इतरांशी चांगले संबंध निर्माण करते. शेजारीपाजारी सगळ्यांशी धरून राहते वेळप्रसंगी हेच लोक तिच्या कुटुंबियांना मदत करायला येतात.

 

ज्या स्त्रीच्या तळपायावर त्रिकोणाकृती आकार असतो ती स्त्री खूप भाग्यशाली असते. त्याशिवाय ज्या स्त्रीचा पायाचे तळवे सर्पाकार म्हणजेच खोलगट असतात ती आपल्या सोबत आनंद व सुख घेऊन येते. ज्या स्त्रीचे डोळे हरणीसारखे असतात ती स्त्री देखील खूप भाग्यशाली असते. ज्या स्त्रीच्या बेंबीबोहती तीळ असते तिझ्या पतीला ती ऐश्वर्य व धन मिळवून देते.

 

अशा प्रकारे या अशा बायका ज्या घरात असतात तिथे भिकारी पण राजा होतो. नशीब चमकते.

Leave a Reply

Your email address will not be published.